लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कार व ट्रकचा भीषण अपघात होऊन ६ जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अंत्रज फाट्याजवळ घडली. येथील घाटपुरी नाका भागातील रहिवाशी माळी कुटुंबीय सराफा भागातील रहिवाशी जैन कुटुंबीय खासगी कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. काम आटोपल्यावर रविवारी ते एमएच-२८ बीके ०४७७ या क्रमांकाच्या कारने औरंगाबादवरून खामगावकडे निघाले. दरम्यान, अंत्रज फाट्याजवळ समोरून येणाºया ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील प्रवीण माळी (वय ५०), स्वाती माळी (वय ४५), सुहानी जैन (वय १७), हेमानी जैन (वय १५), आनंद जैन (वय ४५) व प्रिती जैन (वय ४०) हे गंभीररीत्या जखमी झाले. या अपघातामधील जखमींना रविवारी रात्री येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी प्रवीण माळी व स्वाती माळी यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
कार-ट्रक अपघातात ६ जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:27 IST