शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:15 IST

मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देदिवाळीत हजारो गरीब अन्नधान्यापासून वंचित कर्मचारी, हमालांच्या संपाचा परिणाम

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. जवळपास ५६ टक्के स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळालेच नसल्यामुळे  अनेक खेडेगावात रेशनचा माल पोहचलाच नाही.शासनाने प्रत्येक खेडेगावात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. या दुकानांमधून गोरगरिबांसाठी गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य कमी भावात उपलब्ध करून दिले आहेत. या महागाईच्या काळात रेशनची ही योजना गोरगरिबांसाठी फायदेशीर ठरत असली तरी रेशनचा पुरेपूर माल खर्‍या लाभार्थींपर्यंत पोहचत नाही. जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या काळात रेशनच्या मालाचा मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. रेशनचा माल काळा बाजारात खुलेआमपणे विकल्या जातो. हा सर्व प्रकार जिल्ह्यात सर्वत्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ५६७ रेशन दुकाने असून, ४ लाख ३0 हजा शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. या माध्यमातून १७ लाख लोकांना धान्य वितरण करण्यात येते; मात्र अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संपामुळे पूर्ण जिल्ह्यात ५६ टक्के दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही.१७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली होती. तर १९ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना रेशनचा माल मिळणे गरजेचे असताना या काळात बुलडाणा जिल्हय़ातील सर्व महसूल विभागातील अन्नपुरवठा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. तसेच खामगाव येथे संबंधित ठेकेदार व हमाल यांचासुद्धा काही मागण्यासाठी संप सुरू होता. त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण  जिल्ह्यात अन्नधान्याचे वेळेवर वितरण होऊ शकले नाही. तर अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप असल्याने दुकानदारांना मालाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लाभार्थी रेशनच्या मालापासून वंचित राहिले आहेत. गरीबांना महागडे अन्नधान्य घेऊन दिवाळी साजरी करावी लागली आहे. 

मालाचे वितरण त्वरित व्हावे!काही अडचणीमुळे दिवाळी सणामध्ये ज्या दुकानदारांना माल मिळाला नसेल, त्या दुकानदारांना आता तरी मालाचे वितरण करून देऊन जे गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहिले त्यांना दिवाळी झाल्यावर मालाचे वाटप व्हायला पाहिजे, नाही तर काही दुकानदार आपल्या गावात संपूर्ण माल न नेता इतरत्र त्या मालाची विल्हेवाट लावतात व माल मिळालाच नाही, असे गावात सांगतात. त्यामुळे संबंधित गावच्या सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, दक्षता समिती आदींनी जागृत राहून आपल्या गावात अन्नधान्याचे वाटपावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संप यामुळे काही दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही. तरी पण अवघ्या काही दिवसातच सर्वांना मालाचे वितरण करून प्रत्येक गावात रेशनचा माल पोहचवू.-ए.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी,मेहकर

टॅग्स :zpजिल्हा परिषद