शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

५६ टक्के रेशन दुकानात धान्य मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:15 IST

मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देदिवाळीत हजारो गरीब अन्नधान्यापासून वंचित कर्मचारी, हमालांच्या संपाचा परिणाम

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. जवळपास ५६ टक्के स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळालेच नसल्यामुळे  अनेक खेडेगावात रेशनचा माल पोहचलाच नाही.शासनाने प्रत्येक खेडेगावात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. या दुकानांमधून गोरगरिबांसाठी गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य कमी भावात उपलब्ध करून दिले आहेत. या महागाईच्या काळात रेशनची ही योजना गोरगरिबांसाठी फायदेशीर ठरत असली तरी रेशनचा पुरेपूर माल खर्‍या लाभार्थींपर्यंत पोहचत नाही. जिल्ह्यात मागील दोन वर्षांच्या काळात रेशनच्या मालाचा मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. रेशनचा माल काळा बाजारात खुलेआमपणे विकल्या जातो. हा सर्व प्रकार जिल्ह्यात सर्वत्र नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ५६७ रेशन दुकाने असून, ४ लाख ३0 हजा शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. या माध्यमातून १७ लाख लोकांना धान्य वितरण करण्यात येते; मात्र अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संपामुळे पूर्ण जिल्ह्यात ५६ टक्के दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही.१७ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली होती. तर १९ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंतच जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना रेशनचा माल मिळणे गरजेचे असताना या काळात बुलडाणा जिल्हय़ातील सर्व महसूल विभागातील अन्नपुरवठा कार्यालयातील कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. तसेच खामगाव येथे संबंधित ठेकेदार व हमाल यांचासुद्धा काही मागण्यासाठी संप सुरू होता. त्यामुळे खामगाव येथून संपूर्ण  जिल्ह्यात अन्नधान्याचे वेळेवर वितरण होऊ शकले नाही. तर अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप असल्याने दुकानदारांना मालाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब लाभार्थी रेशनच्या मालापासून वंचित राहिले आहेत. गरीबांना महागडे अन्नधान्य घेऊन दिवाळी साजरी करावी लागली आहे. 

मालाचे वितरण त्वरित व्हावे!काही अडचणीमुळे दिवाळी सणामध्ये ज्या दुकानदारांना माल मिळाला नसेल, त्या दुकानदारांना आता तरी मालाचे वितरण करून देऊन जे गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहिले त्यांना दिवाळी झाल्यावर मालाचे वाटप व्हायला पाहिजे, नाही तर काही दुकानदार आपल्या गावात संपूर्ण माल न नेता इतरत्र त्या मालाची विल्हेवाट लावतात व माल मिळालाच नाही, असे गावात सांगतात. त्यामुळे संबंधित गावच्या सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, दक्षता समिती आदींनी जागृत राहून आपल्या गावात अन्नधान्याचे वाटपावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

अन्नपुरवठा कर्मचार्‍यांचा संप तसेच खामगाव येथील संबंधित ठेकेदार व हमाल यांचा संप यामुळे काही दुकानदारांना मालाचे वितरण होऊ शकले नाही. तरी पण अवघ्या काही दिवसातच सर्वांना मालाचे वितरण करून प्रत्येक गावात रेशनचा माल पोहचवू.-ए.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी,मेहकर

टॅग्स :zpजिल्हा परिषद