शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:23 AM

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ...

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मात्र, अभ्यासासाठी दिवस-रात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ५५ हजार १०८ विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मुलांना अभ्यासाची सवय राहिली नसल्याने व यंदादेखील प्रत्यक्ष जून महिन्यातसुद्धा शाळा सुरू होण्याचा मुहूर्त हुकणार असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे सर्वांत जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली असून, गत १५ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. यामुळे मुलांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण १५ केंद्रांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून एकूण २५१ शाळांपैकी ८९ खाजगी, १५१ जिल्हा परिषद शाळा, तर ११ नगर परिषद शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खाजगी शाळेतील ३८ हजार ६७२, जिल्‍हा परिषद शाळांमधील १४ हजार ९५६, तसेच नगर परिषद शाळेतील १४८० विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. यात दहावीच्या ५०२८, तर बारावीच्या २७७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळणार नसल्याने ते नाराज आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार असल्याने ते अभ्यास करणार नाहीत. रुग्ण कमी झाल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

राम शिंदे (पालक)

पालकांची चिंता वाढली

शाळा सलग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय राहिली नसून अभ्यासाची गोडीसुद्धा कमी झाल्याने पालकांच्याही चिंतेत मोठी भर पडली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाइल आल्याने गेम खेळणे व इतर प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने परीक्षा घ्यायला हवी होती. जेणेकरून परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.