शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

५२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट!

By admin | Updated: May 9, 2017 01:57 IST

‘मे हिट’चा परिणाम : प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई.

हर्षनंदन वाघ बुलडाणा : यावर्षी पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला होता. त्याचा फायदा पिकांना मिळाला नसला, तरी अनेक गावांतील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र ह्यमे हिटह्णमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत, एकूण ५२ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजरोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९.२४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसात जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली होती, तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अनेक गावातील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र मागील एका महिन्यात या प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठय़ा प्रकल्पात एका महिन्यापूर्वी १२.७२ टक्के जलसाठा होता. आता ४.४५ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी खडकपूर्णा प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात एका महिन्यापूर्वी ३0.३0 टक्के जलसाठा होता. आता १७.९0 टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी १५.१२ टक्के जलसाठा होता. आता ८.0८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ८.१५ जलसाठा आहे. ही ११.९0 टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत २.५४ दलघमी जलसाठा आहे. ही ४.२४ टक्केवारी आहे. खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९३.४0 दलघमी साठय़ाच्या तुलनेत मृतसाठा शिल्लक आहे, तर काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे."या" प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी खडकपूर्णा जलसाठय़ात मृतसाठा शिल्लक आहे. मध्यम सात प्रकल्पांपैकी कोराडी प्रकल्प व लघू ८१ प्रकल्पांपैकी ५0 प्रकल्पांमध्ये केसापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगाव, डोंगरशेवली, तेर्‍हारा, हराळखेड, पाटोदा, मिसाळवाडी, अंचरवाडी-१, अंढेरा, पिंपळगाव चिलमखाँ, शिवणी आरमाळ, बोरजवळा, धामधर, फत्तेपूर, जनुना, टिटवी, गांधारी, पिंपळनेर, शिवणी जाट, तांबोळा, कळप विहीर, दे.कुंडपाळ, चोरपांग्रा, अंभोरा, गुंधा, भोरखेडी संत, हिरडव संत, घनवटपूर, चायगाव, सावंगी माळी-१, पळशी, कळमेश्‍वर, पांगरखेड, कंडारी, तांदूळवाडी, आंध्रुड, मांडवा, केशवशिवणी, जागदरी, गायखेड, विद्रूपा, ब्राम्हणवाडा, करडी, मासरूळ या लघू प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. जून महिन्यात अनेक गावांत भीषण पाणीटंचाईयावर्षी उष्णतेत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. आजरोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, ८१ लघूप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८.0१ टक्के जलसाठा होता. आता एकूण ९.२४ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.