शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

५२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट!

By admin | Updated: May 9, 2017 01:57 IST

‘मे हिट’चा परिणाम : प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई.

हर्षनंदन वाघ बुलडाणा : यावर्षी पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला होता. त्याचा फायदा पिकांना मिळाला नसला, तरी अनेक गावांतील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र ह्यमे हिटह्णमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत, एकूण ५२ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजरोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९.२४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसात जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली होती, तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अनेक गावातील पाणीटंचाई दूर झाली होती; मात्र मागील एका महिन्यात या प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठय़ा प्रकल्पात एका महिन्यापूर्वी १२.७२ टक्के जलसाठा होता. आता ४.४५ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी खडकपूर्णा प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात एका महिन्यापूर्वी ३0.३0 टक्के जलसाठा होता. आता १७.९0 टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी १५.१२ टक्के जलसाठा होता. आता ८.0८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ८.१५ जलसाठा आहे. ही ११.९0 टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत २.५४ दलघमी जलसाठा आहे. ही ४.२४ टक्केवारी आहे. खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९३.४0 दलघमी साठय़ाच्या तुलनेत मृतसाठा शिल्लक आहे, तर काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे."या" प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठाजिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी खडकपूर्णा जलसाठय़ात मृतसाठा शिल्लक आहे. मध्यम सात प्रकल्पांपैकी कोराडी प्रकल्प व लघू ८१ प्रकल्पांपैकी ५0 प्रकल्पांमध्ये केसापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगाव, डोंगरशेवली, तेर्‍हारा, हराळखेड, पाटोदा, मिसाळवाडी, अंचरवाडी-१, अंढेरा, पिंपळगाव चिलमखाँ, शिवणी आरमाळ, बोरजवळा, धामधर, फत्तेपूर, जनुना, टिटवी, गांधारी, पिंपळनेर, शिवणी जाट, तांबोळा, कळप विहीर, दे.कुंडपाळ, चोरपांग्रा, अंभोरा, गुंधा, भोरखेडी संत, हिरडव संत, घनवटपूर, चायगाव, सावंगी माळी-१, पळशी, कळमेश्‍वर, पांगरखेड, कंडारी, तांदूळवाडी, आंध्रुड, मांडवा, केशवशिवणी, जागदरी, गायखेड, विद्रूपा, ब्राम्हणवाडा, करडी, मासरूळ या लघू प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. जून महिन्यात अनेक गावांत भीषण पाणीटंचाईयावर्षी उष्णतेत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत. आजरोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, ८१ लघूप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८.0१ टक्के जलसाठा होता. आता एकूण ९.२४ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.