शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:16 IST

शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने तब्बल ४७८ कोटी रुपयांचे खरीपाचे नुकसान केले असून सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे आता पूर्णत्वास गेले असून शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.दरम्यान, प्रसंगी या नुकसानामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडणारा परतीचा आणि अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक खराब झाले तर शेतात लावून ठेवलेल्या पिकाच्या सुड्या या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. एकट्या मेहकर परिसरातील दीडशेपेक्षा अधिक सुड्या पैनगंगा नदीत वाहून गेल्या होत्या. लोणार तालुक्यातही जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान सुड्या वाहून गेल्यामुळे झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४५० कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून १३ ही तालुक्यात १४२० गावात नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले होते. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती फार मोठी होती. प्रत्यक्ष बांधावर जावून हे नुकसान पाहणाºया कारेगाव येथील एका शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू झाल्याची ह्रदय द्रावक घटना घडली होती. एकंदरीत या नुकसानामुळे शेतकरी पुरता हादरून गेला होता.जवळपास १५ दिवस अख्खा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानाची पाहणी करत होता. त्याचा अंतिम अहवाल आता पूर्णत्वास गेला असून बुधवारी किंवा गुरूवारी तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यशासनास हा अहवाल जाईल तेथून केंद्राकडे राज्याचा अहवाल जावून केंद्राचे पथकही जिल्ह्यात पाहणीस येईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल. यासाठी किती काळ लागले हे तुर्तास सांगता येणार नाही. मात्र १५ डिसेंबरच्या आसपास त्यादृष्टीने प्रत्यक्ष हालचाली होवू शकतात, असा अंदाज आहे. अशी असेल नुकसान भरपाईयामध्ये प्रामुख्याने जिरायती क्षेत्रासाठी सहा हजार ८०० रुपये प्रतीहेक्टरप्रमाणे तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतीहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भाती स्थायी आदेश व २०१५ अनुषंगीक विषयान्वये करण्यात आलेल्या काही बदलांचा विचार करून ढोबळमानाने शेतकºयांना नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रप्रती राजवट पाहता प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात नेमकी कधी ही नुकसानाची रक्कम पडेल हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी