शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बुलडाणा जिल्ह्यात ४७८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:16 IST

शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने तब्बल ४७८ कोटी रुपयांचे खरीपाचे नुकसान केले असून सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे आता पूर्णत्वास गेले असून शेवटच्या टप्प्यात कृषी विभाग सध्या नुकसानाच्या आकड्यांची जुळवाजुळव करत आहे.दरम्यान, प्रसंगी या नुकसानामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडणारा परतीचा आणि अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक खराब झाले तर शेतात लावून ठेवलेल्या पिकाच्या सुड्या या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. एकट्या मेहकर परिसरातील दीडशेपेक्षा अधिक सुड्या पैनगंगा नदीत वाहून गेल्या होत्या. लोणार तालुक्यातही जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान सुड्या वाहून गेल्यामुळे झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४५० कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून १३ ही तालुक्यात १४२० गावात नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले होते. या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती फार मोठी होती. प्रत्यक्ष बांधावर जावून हे नुकसान पाहणाºया कारेगाव येथील एका शेतकरी महिलेचा शेतातच मृत्यू झाल्याची ह्रदय द्रावक घटना घडली होती. एकंदरीत या नुकसानामुळे शेतकरी पुरता हादरून गेला होता.जवळपास १५ दिवस अख्खा कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानाची पाहणी करत होता. त्याचा अंतिम अहवाल आता पूर्णत्वास गेला असून बुधवारी किंवा गुरूवारी तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर राज्यशासनास हा अहवाल जाईल तेथून केंद्राकडे राज्याचा अहवाल जावून केंद्राचे पथकही जिल्ह्यात पाहणीस येईल. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल. यासाठी किती काळ लागले हे तुर्तास सांगता येणार नाही. मात्र १५ डिसेंबरच्या आसपास त्यादृष्टीने प्रत्यक्ष हालचाली होवू शकतात, असा अंदाज आहे. अशी असेल नुकसान भरपाईयामध्ये प्रामुख्याने जिरायती क्षेत्रासाठी सहा हजार ८०० रुपये प्रतीहेक्टरप्रमाणे तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतीहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भाती स्थायी आदेश व २०१५ अनुषंगीक विषयान्वये करण्यात आलेल्या काही बदलांचा विचार करून ढोबळमानाने शेतकºयांना नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रप्रती राजवट पाहता प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात नेमकी कधी ही नुकसानाची रक्कम पडेल हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी