शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

४५ अश्वांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:56 IST

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या आजारामुळे जिल्ह्यातील दोन अश्वांना दयामरण द्यावे लागले असून शेगाव तालुक्यातील एका अश्वाचा प्रारंभीच उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. परिणामी धोकादायक ठरणार्या या आजाराची अन्यत्र लागून होऊ नये म्हणून जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील दोन अश्वांना ग्लँडर या आजाराची लागन झाल्याचा अहवाल पुणे प्रयोग शाळेनंतर हरियाणातील प्रयोगशाळने पाठविला होता. त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या संदर्भात नोटीफिकेशन काढल्यानंतर दोन्ही अश्वांना प्राण्यांच्या संसर्गजन्य आजार कायदा २००९ चा आधार घेत इंजेक्शन देऊन दया मरण देण्यात आले होते. त्यानंतर शेगाव तालुक्यातही ग्लँडर आजाराची लागन झालेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे आणि मोताळा तालुक्यातील सारोळा पीर परिसरातील पाच किमी परिघातील पाच अश्वांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ग्लँडर हा दुर्मिळ आजार या आश्वांना झाल्याच्या पृष्ठभूमीवर परिजल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे आणण्यास व बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांची संख्या किती आहे, ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.

बॅक्टेरियामुळे होणारा आजारअश्वांना हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. अशा अश्वांच्या सानिध्यात असलेली अन्य गुरे तथा व्यक्तीलाही हा ग्लँडर नावाचा आजार होण्याची भीती असते. व्यक्तीला खोकला, ताप, सर्दी होऊन नंतर त्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तर काही प्रकरणात त्वचा विकार होऊन ते कधीच दुरुस्त होत नाहीत, अशी धारणा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनेने उपरोक्त भूमिका घेतली त्यामुळेच जालना जिल्ह्यातील पशुमेळाव्यात जिल्ह्यातून अश्ववर्गीय गुरे पाठविण्यात आली नाहीत.

पर्यटन स्थळी सर्वाधीक धोकामाथेरान, शेगाव सारख्या पर्यटन स्थळी राहणारी गर्दी पाहता अशा ठिकाणी हा आजार संक्रमीत होण्याची भीती असते. त्यानुषंगाने शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे रक्तजल नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात  आले आहे. अद्याप त्याचे अहवाल आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा