शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

४५ अश्वांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:56 IST

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या आजारामुळे जिल्ह्यातील दोन अश्वांना दयामरण द्यावे लागले असून शेगाव तालुक्यातील एका अश्वाचा प्रारंभीच उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. परिणामी धोकादायक ठरणार्या या आजाराची अन्यत्र लागून होऊ नये म्हणून जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील दोन अश्वांना ग्लँडर या आजाराची लागन झाल्याचा अहवाल पुणे प्रयोग शाळेनंतर हरियाणातील प्रयोगशाळने पाठविला होता. त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या संदर्भात नोटीफिकेशन काढल्यानंतर दोन्ही अश्वांना प्राण्यांच्या संसर्गजन्य आजार कायदा २००९ चा आधार घेत इंजेक्शन देऊन दया मरण देण्यात आले होते. त्यानंतर शेगाव तालुक्यातही ग्लँडर आजाराची लागन झालेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे आणि मोताळा तालुक्यातील सारोळा पीर परिसरातील पाच किमी परिघातील पाच अश्वांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ग्लँडर हा दुर्मिळ आजार या आश्वांना झाल्याच्या पृष्ठभूमीवर परिजल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे आणण्यास व बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांची संख्या किती आहे, ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.

बॅक्टेरियामुळे होणारा आजारअश्वांना हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. अशा अश्वांच्या सानिध्यात असलेली अन्य गुरे तथा व्यक्तीलाही हा ग्लँडर नावाचा आजार होण्याची भीती असते. व्यक्तीला खोकला, ताप, सर्दी होऊन नंतर त्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तर काही प्रकरणात त्वचा विकार होऊन ते कधीच दुरुस्त होत नाहीत, अशी धारणा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनेने उपरोक्त भूमिका घेतली त्यामुळेच जालना जिल्ह्यातील पशुमेळाव्यात जिल्ह्यातून अश्ववर्गीय गुरे पाठविण्यात आली नाहीत.

पर्यटन स्थळी सर्वाधीक धोकामाथेरान, शेगाव सारख्या पर्यटन स्थळी राहणारी गर्दी पाहता अशा ठिकाणी हा आजार संक्रमीत होण्याची भीती असते. त्यानुषंगाने शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे रक्तजल नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात  आले आहे. अद्याप त्याचे अहवाल आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा