शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४५ अश्वांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:56 IST

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

बुलडाणा: अश्ववर्गीय गुरांपासून अन्य प्राणी व माणसामध्ये संक्रमीत होणार्या ग्लँडर आजाराची लागण झालेल्या जिल्ह्यातील संशयीत ४५ अश्वांचे रक्तजल नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या आजारामुळे जिल्ह्यातील दोन अश्वांना दयामरण द्यावे लागले असून शेगाव तालुक्यातील एका अश्वाचा प्रारंभीच उपचारा अभावी मृत्यू झाला आहे. परिणामी धोकादायक ठरणार्या या आजाराची अन्यत्र लागून होऊ नये म्हणून जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील दोन अश्वांना ग्लँडर या आजाराची लागन झाल्याचा अहवाल पुणे प्रयोग शाळेनंतर हरियाणातील प्रयोगशाळने पाठविला होता. त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी या संदर्भात नोटीफिकेशन काढल्यानंतर दोन्ही अश्वांना प्राण्यांच्या संसर्गजन्य आजार कायदा २००९ चा आधार घेत इंजेक्शन देऊन दया मरण देण्यात आले होते. त्यानंतर शेगाव तालुक्यातही ग्लँडर आजाराची लागन झालेल्या एका अश्वाचा मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे आणि मोताळा तालुक्यातील सारोळा पीर परिसरातील पाच किमी परिघातील पाच अश्वांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ग्लँडर हा दुर्मिळ आजार या आश्वांना झाल्याच्या पृष्ठभूमीवर परिजल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे आणण्यास व बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात अश्ववर्गीय गुरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात अश्ववर्गीय गुरांची संख्या किती आहे, ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.

बॅक्टेरियामुळे होणारा आजारअश्वांना हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. अशा अश्वांच्या सानिध्यात असलेली अन्य गुरे तथा व्यक्तीलाही हा ग्लँडर नावाचा आजार होण्याची भीती असते. व्यक्तीला खोकला, ताप, सर्दी होऊन नंतर त्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तर काही प्रकरणात त्वचा विकार होऊन ते कधीच दुरुस्त होत नाहीत, अशी धारणा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सुत्रांनी स्पष्ट केले. त्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनेने उपरोक्त भूमिका घेतली त्यामुळेच जालना जिल्ह्यातील पशुमेळाव्यात जिल्ह्यातून अश्ववर्गीय गुरे पाठविण्यात आली नाहीत.

पर्यटन स्थळी सर्वाधीक धोकामाथेरान, शेगाव सारख्या पर्यटन स्थळी राहणारी गर्दी पाहता अशा ठिकाणी हा आजार संक्रमीत होण्याची भीती असते. त्यानुषंगाने शेगाव तालुक्यातील ४० अश्वांचे रक्तजल नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात  आले आहे. अद्याप त्याचे अहवाल आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा