शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ४४ कोटींची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:53 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला  झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान  भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप  विभागीय आयुक्त स्तरावरून त्या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी  कार्यालयाला उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या  खात्यात कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमहसूल, वन विभागाने जाहीर केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला  झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान  भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप  विभागीय आयुक्त स्तरावरून त्या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी  कार्यालयाला उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या  खात्यात कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील  ३५६  गावांना तडाखा बसला होता. प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये एक लाख  ९१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे बुलडाणा  जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणावर नुकसानभरपाई मिळेल, असा अंदाज व्य क्त केला जात होता; मात्र प्रत्यक्षात बुलडाणा जिल्ह्यातील ३४ हजार  ९३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे आता स्पष्ट होत असून,  त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई  दोन हेक्टरच्या र्मयादेत मिळणार आहे; मात्र ती प्रत्यक्ष खात्यात कधी  पडेल, हाही कळीचा मुद्दा आहे आणि प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांचे  नुकसान झाले, हा मुद्दाही अद्याप गुलदस्त्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात  राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. त्याच्या नुकसानापोटी  राज्यात ३१३ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपयांची मदत जाहीर करण्या त आली असून, यामध्ये राज्यात एक लाख ४८ हजार ५0३ हेक्टर  जिरायती, एक लाख सहा हजार ७४0 हेक्टर बागायती तर ३८ हजार  ४६ हेक्टर बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी ही रक्कम  दिली जात आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना  १३ मे २0१५ च्या  निर्णयानुसार देण्यात येत आहे. 

असे आहे बाधित क्षेत्रजिल्ह्यात तीन हजार ५४६ .३९ हेक्टर जिरायती तर २८ हजार  २९७.८८ हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांचे दोन हजार २४९.४0 हेक्टर  क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाले आहे. त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख रु पयांची मदत राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा