शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४३ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:55 IST

बुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ मे पर्यंत जवळपास ४३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ मे पर्यंत जवळपास ४३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ९०० शेतकर्यांना हे कर्ज वाटप करण्यात आले आहे.यावर्षी बुलडाणा जिल्ह्यासाठीच्या वार्षिक पतआराखड्यातंर्गत एक हजार ७७३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. ३० सप्टेंबर पर्यंत हे पीक कर्ज वाटप करण्याची मुदत आहे. त्यानुषंगाने खरीपाचा हंगाम जवळ येत असल्याने बँकांनीही पीक कर्ज वाटपाच्या दृष्टीने सक्रीयता दाखवणे सुरू केले आहे. शेतकºयांचाही बँकांमध्ये आता गर्दी होत आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची परिस्थिती दोलायमान असल्याने खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील आणि व्यापारी बँकांवरच प्रामुख्याने पीककर्ज वाटपाची मदार आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७१ हजार ७० शेतकर्यांची मदार ही प्रामुख्याने या २३ बँकांच्या जिल्ह्यातील २४३ शाखांवर अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी खरीप कर्ज वाटपाची मुदत संपेपर्यंत शेतकर्यांना प्रत्यक्षात ३४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले होते. त्यामुळे यंदा अग्रणी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांवर शेतकर्यांना पीक कर्ज वाटपासाठी दबाव वाढलेला आहे.जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतानाच आठ तालुक्यात दुष्काळ तर उर्वरित पाच तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आलेला आहे. परिणामी खरीपाच्या हंगामासाठी त्याला पैशाची मोठी निकड आहे. गेल्या वर्षीही घाटाखालील जवलपास सात तालुक्यामध्ये दुष्काळ होता. त्यानंतर यंदाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यातच यंदा कृषी विभागानेही सात लाख ३८ हजार हेक्टरच्या आसपास जिल्ह्यात खरीपाच्या पेर्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे फारसे खत शेतकर्यांनी घेतले नसल्याने यंदा खताचीही उपलब्धता बर्यापैकी आहे, असा कयासही व्यक्त केला जात आहे.दरम्यान, गेल्या नऊ मे रोजी पर्यंत जिल्ह्यातील ८०० शेतकर्यांना ३८ कोटी रुपयापर्यंत पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहेत. दरम्यान, पीक कर्जाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा बँकर्स समितीची बैठक घेऊनही त्या सुचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत निश्चितच पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढेल असाही कयास बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दरम्यान येत्या काळात पीक कर्ज पुनर्गठनाचाही प्रश्न उपस्थित होणार असून जवळपास ७९ हजार ९६ शेतकर्यांचे ५६० कोटी रुपयांचे पीक कर्जही पूनर्गठीत करावे लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज