शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात ४२ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:24 IST

Crop loss due to heavy rains Buldhana ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसाने अद्द्याप पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान केले नसले तरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यात खरीपाचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, सप्टेंबरमधील या पावसामुळे ६१ हजार ६८९ हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला असून ६४ हजार ७१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेल्या अंतिम अहवालावरून ही बाब स्पष्ट होत आहे.दुसरीकडे जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसून जवळपास २६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते तर एकट्या सप्टेंबर महिन्यात पावसामुळे ४२ कोटी २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या सिंदखेड राजा तालुक्यात चार कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातही एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यात तुलनेने कमी नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना सलग दुसऱ्यावर्षी फटका बसला आहे.

सिंदखेड राजातील सर्वाधिक शेतकरी बाधीतसिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे बाधीत झाले आहेत. ६४ हजार ७१० शेतकऱ्यांपैकी एकट्या सिंदखेड राजा तालुक्यातील ५९ हजार ४०१ शेतकऱ्यांचा बाधीतांमध्ये समावेश आहे. मेहकर तालुक्यातील दीड हजार शेतकरी, देऊळगाव राजा तालुक्यातील ७१९ शेतकरी तर खामगाव तालुक्यातील दोन हजार शेतकरी संप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी