बुलडाणा : अपघात कशामुळे व कोणत्या चुकीमुळे होतात, यांचे चिंतन करण्याची वेळ आता येवून ठेपली आहे. कारण गेल्या एप्रिल आणि मे या दीड महिन्याच्या काळात जिल्हाभरात झालेल्या ४६ अपघातात ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर १७४ लोक जखमी झाले. जिल्ह्यातील बेशिस्त वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असून, अपघाताची ही मालिका सुरु आहे. खरे तर अपघाताची ही मालिका १0 एप्रिलनंतर सुरु झाली; मात्र त्यापूर्वी ३१ मार्च रोजी मोताळा आणि मेहकर तसेच ४ एप्रिल रोजी चोरपांग्रा व खामगाव शिवारात झालेल्या विविध अपघातात एक जण ठार झाला होता, तर ६ प्रवासी जखमी झाले होते. ११ एप्रिल रोजी मोताळा येथे ट्रॉली उलटून एक महिला ठार झाली. तर १३ एप्रिल रोजी मलकापूर येथे झालेल्या अपघातात १ ठार तर ३ जखमी झाले. तर १४ ला खामगाव येथे एकाचा मृत्यू झाला. यानंतर १६ ला मलकापूर आणि खामगाव येथील महामार्गावर दोन अपघात घडले. यात ३ ठार आणि १ प्रवासी जखमी झाला. १७ एप्रिल रोजी साखरखेर्डा व मोताळा येथे झालेल्या अपघातात २ ठार झाले. तर १८ एप्रिलला मोताळा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला. १९ एप्रिल रोजी नांदुरा शहरनजिक अपघात होऊन १ ठार, १ जखमी झाला. तर २0 एप्रिल रोजी मोताळा आणि सोनाटी येथे अपघातात २ जण गंभीर जखमी झाले. २१ एप्रिल रोजी मोताळा, खामगाव आणि सुलतानपूर येथे अपघातात १ ठार आणि ६ लोक जखमी झाले. २२ रोजी मोताळा शहरानजिक ट्रॉलीवर दुचाकी आदळून शिक्षकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. २३ एप्रिल रोजी मेहकर नजिक लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या मेटाडोरला अपघात होऊन २0 वर्हाडी जखमी झाले होते. खामगाव आणि मलकापूर येथील महामार्गावर २७ एप्रिल रोजी झालेल्या विविध अपघातात २ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर ७ जण जखमी झाले. शेगाव येथे २९ एप्रिलला एका पादचार्याला वाहनाने उडविले. २९ एप्रिलला चिखली तालुक्यातील शेलसूर येथे दुचाकी अपघातात २ तरुण ठार झाले तर बुलडाणा तालुक्यातील धांदरवाडी येथे दोघांना अज्ञात वाहनाने यमसदनी पाठविले. तर ३0 एप्रिल नांदुरा येथे खासगी वाहनाला अपघात होऊन ६ जखमी झाले.
दीड महिन्यात ३१ ठार, १७४ जखमी
By admin | Updated: May 16, 2014 00:04 IST