शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यातील २.७३ लाख शेतकरी ‘हॉर्टनेट’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:35 IST

राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’  प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून,   ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते.आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. मुदत  संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील योजनांची अमलबजावणी ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात येते. आतापर्यंत राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’  प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून,   ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे. मात्र सध्या या प्रणालीची सेवा वांरवार विस्कळीत होत असल्याने फलोत्पादन अभियानासाठी आॅनलाईनचा खोडा निर्माण होत आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते. शेतकºयांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे अभियान ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत सुटी फुले, मसाला पीके, आंबा लागवड, हरित गृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग, पॉली हाऊसमधील उच्च दर्जाचा भाजीपाला लागवड साहित्य व निविष्ठा, मनुष्यबळ विकास कार्यक्रम, पॅक हाऊस इत्यादी घटकांसाठी लाभ देण्यात येतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील हॉर्टनेट लागू असणाºया बाबींसाठी (पॅक हाऊस वगळता) वैयक्तीक शेतकरी, उद्योजक, संस्था यांना लाभ घेता येतो. त्यासाठी हॉर्टनेट या संकेतस्थाळावरुन शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने पुन्हा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली होती. २९ जून पर्यंत राज्यभरातून २ लाख ७३ हजार ६१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत.  त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अहमदनगर जिल्ह्यातून म्हणजे ७५ हजार ९२७ अर्ज करण्यात आले. अर्ज करण्यासाठी एकच दिवस उरला असून हॉर्टनेट प्रणाली वारंवार बंद पडत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करण्यासाठी शेतकºयांच्या महा-ई सेवा केंद्रावर रांगा लागत आहेत. मुदत  संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी