शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

राज्यातील २.७३ लाख शेतकरी ‘हॉर्टनेट’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:35 IST

राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’  प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून,   ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.

ठळक मुद्देशेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते.आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. मुदत  संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील योजनांची अमलबजावणी ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात येते. आतापर्यंत राज्यातील २ लाख ७३ हजार ६१ शेतकऱ्यांचे ‘हॉर्टनेट’  प्रणालीवर आॅनलाईन अर्ज आले असून,   ३० जून ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे. मात्र सध्या या प्रणालीची सेवा वांरवार विस्कळीत होत असल्याने फलोत्पादन अभियानासाठी आॅनलाईनचा खोडा निर्माण होत आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येते. शेतकºयांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे अभियान ‘हॉर्टनेट’ प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत सुटी फुले, मसाला पीके, आंबा लागवड, हरित गृह, शेडनेट हाऊस, मल्चिंग, पॉली हाऊसमधील उच्च दर्जाचा भाजीपाला लागवड साहित्य व निविष्ठा, मनुष्यबळ विकास कार्यक्रम, पॅक हाऊस इत्यादी घटकांसाठी लाभ देण्यात येतो. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील हॉर्टनेट लागू असणाºया बाबींसाठी (पॅक हाऊस वगळता) वैयक्तीक शेतकरी, उद्योजक, संस्था यांना लाभ घेता येतो. त्यासाठी हॉर्टनेट या संकेतस्थाळावरुन शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाने २० जून ही अंतीम मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत अनेक शेतकरी अर्ज करू शकले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने पुन्हा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली होती. २९ जून पर्यंत राज्यभरातून २ लाख ७३ हजार ६१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत.  त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अहमदनगर जिल्ह्यातून म्हणजे ७५ हजार ९२७ अर्ज करण्यात आले. अर्ज करण्यासाठी एकच दिवस उरला असून हॉर्टनेट प्रणाली वारंवार बंद पडत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज करण्यासाठी शेतकºयांच्या महा-ई सेवा केंद्रावर रांगा लागत आहेत. मुदत  संपत आल्याने काही ई-सेवा केंद्रावर रात्रीच्यावेळीही आॅनलाईन अर्ज करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी