शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

आठवडाभरात २६ टँकरला  मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:19 IST

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे;

बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरची प्रतीक्षा कायम आहे. गतवर्षी पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्याने हिवाळ्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरूवात झाली होती. सध्या जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढली असून त्यासाठी टँकर सुरू करणे, विहिर अधिग्रहण करणे याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धांदल उडत आहे. दरम्यान, ९ एप्रिल रोजी  जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ११ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याध्ये     खामगाव राजा तालुक्यातील पारखेड, आवार, लोणी गुरव, शेलोडी, खुटपुरी, बोरजवळा याठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर नांदुरा  तालुक्यातील  जवळा बाजार, शेगांव तालुक्यातील लासुर खु., लासुरा बु., सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खुर्द,  दरेगांव येथे टँकरला मान्यता देण्यात आली आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या आठवडाभरामध्ये २६ टँकर   टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी दिले आहे. 

 विहिर अधिग्रहणावरही भर जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी दरडोई दरदिवशी २० लिटर्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात नांदुरा तालुक्यातील सात, मलकापूर  व मोताळा तालुक्यातील गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले. तर विहिर अधिग्रहणावरही भर देण्यात येत आहे. 

टँकर सुरू करण्यासाठी पशुधनाचाही विचारटंचाईग्रस्त असलेल्या कुठल्याही गावात टँकर सुरू करण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या विचारात घेतली जाते. त्याचबरोबर गावातील पशुधनाचीही संख्या पाहून त्याठिकाणी किती लिटर्स पाणी पाठवायचे याला मान्यता दिली जात आहे. अडीच हजार लोकसंख्या  व एक हजार पर्यंत पशुधन असलेल्या गावांसाठी ६५ ते ७० हजार लिटर्स टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई