शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:06 IST

गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले.

बुलडाणा: परतीच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गेल्या दीड महिन्यात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून संपलेल्या २४ तासात आणखी दोन शेतकºयांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, शेतकºयांना त्वरेने मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाही आता आक्रमक झाली असून तत्काळ मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले. त्यामुळे बुलडाणा जिल्हत सहा लाख ८० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना फटका बसून तब्बल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहजासहजी हे नुकसान भरून निघणारे नाही. नुकसानाची व्याप्ती पाहून लोणार तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी महिला सोयाबीनच्या सुडीजवळच कोसळली होती. शेवटी या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. यावरून यंदा परतीच्या पावसाने नुकसानाचा कोणता कळस गाठला हे अधोरेखीत होते.नाही म्हणायला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षणसदृश्य स्थिती होती. यंदा काय तो २०१३ नंतर चांगला पाऊस पडला. मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात या पावसाने कहर केल्याने शेतकरी हवाल दिली झाला. वार्षिक सरासरीच्या तब्बल २२ टक्के पाऊस हा परतीचा पाऊस पडला आहे. त्यावरून नुकसानाची गंभीरताही स्पष्ट होते. या स्थितीमुळे शेतकºयांचे अर्थचक्रही बिघडले असून आता खरीपासाठी शेतकºयांना पुन्हा आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. एक आॅक्टोबर पासून जिल्ह्यात रब्बीसाठी पीक कर्जाचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे १६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जवळपास एकहजार ५०० शेतकºयांना त्याचा लाभ झाला असला तरी अन्य शेतकºयांना या पीक कर्जाची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची त्वरित मदत शेतकºयांना मिळावी, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकºयांना प्रत्यक्ष मदत कधी मिळले असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत राजकीय खेळामध्येच सध्या सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाल्याने शेतकºयाला मदत मिळण्यात अडचण जात आहे.एकंदरीत दीड महिन्यात जिल्ह्यात २३ शेतकºयांनी निसर्गाचा झालेला कोप पाहता आपले जीवन संपवले असून गेल्या २४ तासात त्यात आणखी दोन शेतकºयांची भर पडून हा आकडा आता २५ वर पोहोचला आहे. पैकी प्रत्यक्षात तीन शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असून २२ मृत शेतकºयांचे कुटुंबिय अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.१८ वर्षात २,९२२ आत्महत्या; मदत साडेतेरा कोटींचीजिल्ह्यात २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेण्यात येत असून मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्यात येत आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार ९२२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी प्रत्यक्षात एक हजार ३४९ मृत शेतकºयांच्या कुटुंबियांनाच मदत मिळाली असून त्याचा आकडा हा १३ कोटी ४९ लाखांच्या घरात जातो तर संपत आलेल्या चालू वर्षात आतापर्यंत २३२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून पैकी ७६ प्रकरणात मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.२४ तासात दोन आत्महत्याधाड/खामगाव: गेल्या २४ तासात जिल्ह्यात दोन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड नजीक असलेल्या टाकळी येथे ५५ वर्षीय शेतकरी पंडीतराव राजाराम शिंब्रे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. १४ नोव्हेंबरलाच ते घारतून कोणाला काही न सांगता निघून गेले होते. दरम्यान त्यांचे भाऊ दादाराव शिंब्रे यांच्या मक्याच्या शेतात त्यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला. कर्जबाजारीपणा आणि शेतीचे नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसापासून ते विवंचनेत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, बहिण असा आप्त परिवार आहे. दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरीआडगाव येथे ही १४ नोव्हेंबर रोजी गणेश विठ्ठल मेतकर (५०) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या