शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:06 IST

गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले.

बुलडाणा: परतीच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गेल्या दीड महिन्यात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून संपलेल्या २४ तासात आणखी दोन शेतकºयांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, शेतकºयांना त्वरेने मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाही आता आक्रमक झाली असून तत्काळ मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले. त्यामुळे बुलडाणा जिल्हत सहा लाख ८० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना फटका बसून तब्बल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहजासहजी हे नुकसान भरून निघणारे नाही. नुकसानाची व्याप्ती पाहून लोणार तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी महिला सोयाबीनच्या सुडीजवळच कोसळली होती. शेवटी या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. यावरून यंदा परतीच्या पावसाने नुकसानाचा कोणता कळस गाठला हे अधोरेखीत होते.नाही म्हणायला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षणसदृश्य स्थिती होती. यंदा काय तो २०१३ नंतर चांगला पाऊस पडला. मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात या पावसाने कहर केल्याने शेतकरी हवाल दिली झाला. वार्षिक सरासरीच्या तब्बल २२ टक्के पाऊस हा परतीचा पाऊस पडला आहे. त्यावरून नुकसानाची गंभीरताही स्पष्ट होते. या स्थितीमुळे शेतकºयांचे अर्थचक्रही बिघडले असून आता खरीपासाठी शेतकºयांना पुन्हा आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. एक आॅक्टोबर पासून जिल्ह्यात रब्बीसाठी पीक कर्जाचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे १६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जवळपास एकहजार ५०० शेतकºयांना त्याचा लाभ झाला असला तरी अन्य शेतकºयांना या पीक कर्जाची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची त्वरित मदत शेतकºयांना मिळावी, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकºयांना प्रत्यक्ष मदत कधी मिळले असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत राजकीय खेळामध्येच सध्या सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाल्याने शेतकºयाला मदत मिळण्यात अडचण जात आहे.एकंदरीत दीड महिन्यात जिल्ह्यात २३ शेतकºयांनी निसर्गाचा झालेला कोप पाहता आपले जीवन संपवले असून गेल्या २४ तासात त्यात आणखी दोन शेतकºयांची भर पडून हा आकडा आता २५ वर पोहोचला आहे. पैकी प्रत्यक्षात तीन शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असून २२ मृत शेतकºयांचे कुटुंबिय अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.१८ वर्षात २,९२२ आत्महत्या; मदत साडेतेरा कोटींचीजिल्ह्यात २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेण्यात येत असून मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्यात येत आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार ९२२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी प्रत्यक्षात एक हजार ३४९ मृत शेतकºयांच्या कुटुंबियांनाच मदत मिळाली असून त्याचा आकडा हा १३ कोटी ४९ लाखांच्या घरात जातो तर संपत आलेल्या चालू वर्षात आतापर्यंत २३२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून पैकी ७६ प्रकरणात मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.२४ तासात दोन आत्महत्याधाड/खामगाव: गेल्या २४ तासात जिल्ह्यात दोन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड नजीक असलेल्या टाकळी येथे ५५ वर्षीय शेतकरी पंडीतराव राजाराम शिंब्रे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. १४ नोव्हेंबरलाच ते घारतून कोणाला काही न सांगता निघून गेले होते. दरम्यान त्यांचे भाऊ दादाराव शिंब्रे यांच्या मक्याच्या शेतात त्यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला. कर्जबाजारीपणा आणि शेतीचे नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसापासून ते विवंचनेत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, बहिण असा आप्त परिवार आहे. दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरीआडगाव येथे ही १४ नोव्हेंबर रोजी गणेश विठ्ठल मेतकर (५०) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या