शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात ‘आरटीई’ प्रवेशासाठी दोन हजार २८८ अर्ज  दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:44 IST

बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची  प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे.  यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश  घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून,  आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन  हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

ठळक मुद्दे२२0 शाळांत २ हजार ९९३ प्रवेश अर्ज भरण्यासाठी उरले तीन दिवस

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची  प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे.  यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश  घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून,  आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन  हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिक्षण हक्क कायद्याने (राइट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई)  मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांंना  मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मागासवर्गीय  व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात  आणणे हा यामागील हेतू आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला  पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल, अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण  प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई अंतर्गत  जिल्ह्यात २२0 नामांकित खासगी शाळा आहेत.  २0१८-१९ या  शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता  १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जात  आहे. आतापर्यंंत जिल्ह्यातील २ हजार ९९३ जागांसाठी २ हजार २८८  अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारी  असून, अद्याप ७0५ जागांसाठी अर्ज प्राप्त होणे बाकी आहे. ऑनलाइन  अर्ज भरण्यामध्ये इंटरनेट सुविधेचाही खोडा निर्माण होत असल्याने  अनेक पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज करण्यासाठी प्रतीक्षा करावी  लागत आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी येत्या तीन  दिवसांत पालकांना अर्ज करावे लागणार आहेत.  

राज्यातून १ लाख २१ हजार अर्जआरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये राज्यातील ८ हजार ९८0  शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरात १ लाख  २६ हजार १२९ विद्यार्थ्यांंचे प्रवेश घेण्यात येणार आहेत. अर्ज  भरण्यासाठी तीन दिवस उरले असताना आतापर्यंंत ९६ टक्के म्हणजे १  लाख २१ हजार २८0 अर्ज प्राप्त झाले आहेत.

याच बालकांना मिळतो प्रवेश!दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रु पयांपर्यंंत आहे, अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जा ती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके २५  टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आरटीई अंतर्गत  मोफत प्रवेश करण्याकरिता आलेल्या अर्जापैकी अनेक अर्ज हे विविध  त्रुटींमुळे रद्द होतात.

कागदपत्रांच्या अडचणी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांना रहिवासी किंवा  वास्तव्याचा पुरावा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय  अधिकार्‍यांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व असल्यास तसे प्रमाणपत्र,  तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडून कुटुंबाचा उत्पन्नाचा  दाखला द्यावा लागतो. त्याच्या पूर्ततेसाठी मोठय़ा अडचणीही येत आहेत.

 सन २0१८-१९ या शैक्षणिक वर्षात आरटीई २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यात येत असून,  २८ फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. शाळेच्या आरंभीच्या  वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत  पद्धतीने प्रवेश दिले जातील.                        - एस.टी. वराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा