शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

बुलडाणा जिल्हय़ात ‘आरटीई’ प्रवेशासाठी दोन हजार २८८ अर्ज  दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:44 IST

बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची  प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे.  यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश  घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून,  आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन  हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

ठळक मुद्दे२२0 शाळांत २ हजार ९९३ प्रवेश अर्ज भरण्यासाठी उरले तीन दिवस

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची  प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे.  यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश  घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून,  आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन  हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिक्षण हक्क कायद्याने (राइट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई)  मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांंना  मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मागासवर्गीय  व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात  आणणे हा यामागील हेतू आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला  पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल, अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण  प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई अंतर्गत  जिल्ह्यात २२0 नामांकित खासगी शाळा आहेत.  २0१८-१९ या  शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता  १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जात  आहे. आतापर्यंंत जिल्ह्यातील २ हजार ९९३ जागांसाठी २ हजार २८८  अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारी  असून, अद्याप ७0५ जागांसाठी अर्ज प्राप्त होणे बाकी आहे. ऑनलाइन  अर्ज भरण्यामध्ये इंटरनेट सुविधेचाही खोडा निर्माण होत असल्याने  अनेक पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज करण्यासाठी प्रतीक्षा करावी  लागत आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी येत्या तीन  दिवसांत पालकांना अर्ज करावे लागणार आहेत.  

राज्यातून १ लाख २१ हजार अर्जआरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये राज्यातील ८ हजार ९८0  शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरात १ लाख  २६ हजार १२९ विद्यार्थ्यांंचे प्रवेश घेण्यात येणार आहेत. अर्ज  भरण्यासाठी तीन दिवस उरले असताना आतापर्यंंत ९६ टक्के म्हणजे १  लाख २१ हजार २८0 अर्ज प्राप्त झाले आहेत.

याच बालकांना मिळतो प्रवेश!दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रु पयांपर्यंंत आहे, अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जा ती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके २५  टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आरटीई अंतर्गत  मोफत प्रवेश करण्याकरिता आलेल्या अर्जापैकी अनेक अर्ज हे विविध  त्रुटींमुळे रद्द होतात.

कागदपत्रांच्या अडचणी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांना रहिवासी किंवा  वास्तव्याचा पुरावा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय  अधिकार्‍यांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व असल्यास तसे प्रमाणपत्र,  तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडून कुटुंबाचा उत्पन्नाचा  दाखला द्यावा लागतो. त्याच्या पूर्ततेसाठी मोठय़ा अडचणीही येत आहेत.

 सन २0१८-१९ या शैक्षणिक वर्षात आरटीई २५ टक्के मोफत  प्रवेशासाठी १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यात येत असून,  २८ फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. शाळेच्या आरंभीच्या  वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत  पद्धतीने प्रवेश दिले जातील.                        - एस.टी. वराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा