शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

पीककर्जाचे १५०० कोटींचे उदिष्ट, केवळ २४४ कोटींचे वितरण

By विवेक चांदुरकर | Updated: June 3, 2024 14:21 IST

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जून महिन्याला प्रारंभ झाला असून पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होणार आहे. पीककर्ज वाटपात बॅंकांची ...

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जून महिन्याला प्रारंभ झाला असून पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होणार आहे. पीककर्ज वाटपात बॅंकांची गती अत्यंत धीमी असून, शेतकर्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याकरिता बॅंकांच्यावतीने त्रास देण्यात येत आहे. जिल्ह्यात पीककर्जाचे १५०० कोटींचे उदिष्ट, केवळ २४४ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

खरीप हंगामात पेरणी करण्याकरिता दरवर्षी बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना एका वर्षाकरिता बिनव्याजी पीककर्ज देण्यात येते. पूर्वी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत होते. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. बॅंकाकडून बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकर्यांना बराच लाभ मिळाला आहे. मुदतीच्या आत शेतकर्यांनी जुने कर्ज भरल्यावर नवीन कर्ज देण्यात येते. यावर्षी बुलढाणा जिल्ह्याला १५०० कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. जून महिन्याच्या २ तारखेपर्यंत जिल्ह्यात २४४ कोटींचे वाटप करण्यात आले. यात यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती नगण्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ३० जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच १० टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा, पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.कागदपत्रांसाठी अधिकार्यांकडून त्रास

काही बॅंकांच्यावतीने शेतकर्यांना अनावश्यक कागदपत्रे मागवण्यात येतात. त्याकरिता शेतकर्यांना बरेच पैसेही खर्च करावे लागते. तसेच काही बॅंकांच्यावतीने विनाकारण पीककर्ज देण्यास विलंब करण्यात येत असल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी अशा बॅंकाच्या अधिकारी, कर्मचार्यावर कारवाइ करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.ही कागदपत्रे आवश्यक

पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.

खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पिक कर्जाचे अत्यल्प वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे. - डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र