शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

'लाल'परीच्या १५ हजारा फेऱ्या तोट्यात; एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:45 IST

खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.

अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक बाब एसटीच्या एका अहवालातून पुढे आली आहे.

 प्रवाशांच्या सेवेसाठी  हे ब्रिद असलेल्या एसटी महामंडळाची  'लालपरी'  महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे प्रवासाचे मुख्य साधन आहे. शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणूनही एसटीकडे पाहण्यात येते. तर दुर्गम आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठीही एसटीच धावून जाते. राज्यातील ३७ हजार ४१७ खेड्यांपैकी जवळपास ९० टक्के भागांमध्ये एसटीकडून प्रवासी सेवा पुरविली जाते. मात्र, ही सेवा देताना महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाकडून फायदा आणि तोट्यातील फेऱ्यांचे वर्गीकरण केले जाते. यात अ-वर्गातील फेऱ्या म्हणजे, फायद्यातील फेऱ्या, ब-वर्गातील  फेऱ्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या तर क-वर्गातील फेऱ्या या पूर्णत: तोट्या चालणाऱ्या फेऱ्या आहेत. एसटी महामंडळाकडून सध्या ज्या फेऱ्यांना प्रतिसाद नाही अशा फेऱ्या बंद केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील फेºया तोट्यात असल्या तरी, , सामाजिक बांधिलकी म्हणून महामंडळाकडून या फेऱ्या चालविल्या जात असल्याची माहिती एसटीच्या एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

सक्तीची 'बंधनकारक' सेवा अडचणीची!

राज्यातील ९५ टक्के भागात एसटी महामंडळाकडून प्रवासी सेवा दिली जाते. यामध्ये ग्रामीण भागात खासकरून दुर्गम भागात प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या चालविण्यात येतात.  यामध्ये लोकप्रतिनिधींच्या दबावातून आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी काही बंधनकारक फेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक फऱ्यांमुळे एसटीला तब्बल २५० कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

नफा निहाय फेऱ्यांची वर्गवारी!

महामंडळाच्या दररोज एकूण ९७ हजार ६00 फेºया धावतात. यातील अ-वर्गात २४ हजार ७00 फेºयांचा समावेश आहे. तर ब-वर्गात ५७ हजार ९00 फेºयांचा समावेश असून, क-वर्गातील या १४ हजार ९६0 फेºया आहेत. म्हणजेच एकूण फेºयांपैकी १४ हजार ९६0 फेºया हा पूर्णत: तोट्यातील आहेत. या फेºयांमुळे महामंडळाला वर्षाला २५0 कोटींचा तोटा सहन करावा लागतो.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळ