शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बुलडाणा जिल्ह्यात नागरी भागातील १४२६ हातपंप अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:42 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली आहे.

- नीलेश जोशी  बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान भुगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाल्यान यातील बहुतांश हातपंप कोरडे पडले आहे. परिणामी नागरिकांनी त्यांचा वापर करणे बंद केल्याने हे हातपंप कायमचे विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील बहुतांश हातपंपांचीही हीच स्थिती आहे.दरम्यान, काही ठिकाणीतर हे हातपंप पूर्णत: जमीनत गाडल्या गेल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद आणि पालिकांचा देखभाल दुरुस्ती करणारा विभाग नेमके करतो तरी काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी भागातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात एकमेव मलकापूर पालिकेने १२० पैकी ९८ हातपंप सुस्थितीत असल्याची लिखीत स्वरुपात माहिती दिली आहे. मात्र उर्वरित १२ पालिकांनी त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.१९८० च्या दशकात टंचाईवर मात करण्यासाठी प्रामुख्याने गावोगावी, शहरांमध्ये विंधन विहीरी घेऊन हातपंप बसविण्याचे एक मोठे फॅडच आले होते. साधारणत: २५० लोकसंख्येचा विचार करून हे हातपंप तेव्हापासून देण्यात येत आहे. अगदी आमदार निधी, जिल्हा परिषद सदस्यांना मिळणारा निधी, खासदार निधीचा यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशा भूमिकेतून नागरिकांसोबतच प्रशासनानेचही या हातपंपांकडे दुर्लक्ष झाले आहे. बंद पडलेल्या या हातपंपाच्या माध्यमातून २०० फुटाखालील अ‍ॅक्वीफोर अर्थात जलधर खडक रिचार्ज करण्याचा प्रयत्नही प्रशासकीय पातळीवर किंवा सामाजिकस्तरावर दिसून आलेला नाही. एक प्रकारे जलसाक्षरेबाबतची संशोधक वृत्तीच आज नष्ट होऊ पाहते की काय? अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे.  कधी काळी याच हातपंपांनी शहरी तथा ग्रामीण भागातील अख्ख्या गावाची तहान भावगली होती. मात्र घटता भूजलस्तर पाहता हे हातपंप आज अडगळीत पडले आहे. तसे पाहता यासाठी झालेला कोट्यावधी रुपयांच्या खर्चाचीही सध्या यंत्रणेला जाण राहलेली नाही. गेल्या दोन दशकामध्ये अगदी गल्ली बोळात हातपंप घेण्यात आले होते. मात्र आज घरपोच आरोचे पाणी पोहोचत असल्याने हातपंप अडगळीत पडले आहेत.बोअर घेताना २०० फुटांची मर्यादावास्तविक बोअर घेताना शासनाने २०० फुटांची मर्यादा घालून दिलेली आहे. शासकीय यंत्रणा हा नियम पाळत असल्या तरी खासगीस्तरावर त्याबाबत फारसे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा हातपंपांजवळ खासगी व्यक्तीने घेतलेला बोअर हा अडीशे ते साडेतीनशे फुटापर्यंत घेतल्या जातो. परिणामी जमिनीखालील जलधर खडकातील ( अ‍ॅक्वीफोर) संपूर्ण पाणी खेचल्या जाते आणि भूजल पातळी खालावते. दुसरीकडे शासकीयस्तरावरून घेण्यात आलेले बोअर हे २०० फुट खोलीची मर्यादा आणि महिलांची पाणी हापसण्याची शारीरिक क्षमता विचारा घेऊन मर्यादी स्वरुपातच खोल घेतल्या गेलेले आहेत असे भुजल सर्व्हेक्षण विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ््यात बहुतांश हातपंप कोरडे पडून नंतर त्यांचा वापर होणेच बंद होते.

जिल्हा परिषदेतंर्गत ग्रामीण भागातील हातपंप सुरळीत सुरू आहेत. काही ठिकाणी अडचण असल्यास तक्रार प्राप्त होताच ते सुरळीत करण्यात येतील. जेथे पाणीच उपलब्ध नाही तेथे समस्या राहू शकते- मोहन भटउपयभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प. बुलडाणा.

भिलवाडा परिसरातील पाच हातपंप सुरू केले आहेत. काही भागातील जुने हातपंप बंद झालेले आहेत. मात्र तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची दुरुस्ती केली जाईल.- राहूल मापारी,पाणीपुरवठा अभियंता,नगर पालिका, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई