शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

पीक नुकसानापोटी १३६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:56 IST

नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीचा पाऊस व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीपाच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य शासनाकडून १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. दरम्यान, हा नुकसान भरपाईचा हा पहिला हप्ता आहे किंवा आणखी काही टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी नुकसान भरपाई मिळणार आहे का? याबाबत स्पष्टपणे माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.शेतकऱ्यांमध्ये असलेली राज्य शासनाप्रतीची प्रचंड नाराजी पाहता किमानपक्षी हा निधी मिळाल्याचा दिलासा शेतकºयांना मिळाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी करताना शेतकºयांना काही प्रमाणात आर्थिक मदत यामुळे होणार आहे.जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे यंदा खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात तबब्ल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. सहा लाख ९० हजार ६०२.५४ हेक्टरवर नुकसान झाले होते. तेराही तालुक्यात खरीपाच्या नुकसानाची व्याप्ती मोठी होती. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जवळपास सरासरी ११ दिवस हा परतीचा व अवकाळी पाऊस पडला होता. आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडून त्याने शेतकºयांचे खरीप पिकांचे आतोनात नुकसान केले होते. २०१४ नंतर प्रथमच जिल्ह्यात २१८ टक्के अवकाळी पाऊस झाला होता. त्यावरून या पावसाने केलेल्या नुकसानाची व्याप्ती समोर यावी. एकट्या मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीकाठच्या शेतकºयांच्या दीडशे पेक्षा अधिक धान्याच्या सुड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या तर लोणार तालुक्यात सुड्या वाहून गेल्यामुळे जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.त्या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने ४५० पथकांद्वारे अगदी बांधावर जावून शेतकºयांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला होता. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या या नुकसानाचा अहवाल हा विभागीय आयुक्त आणि पुणे येथील कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. अमरावती विभागात सर्वाधिक नुकसान हे एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्याचे खासदार प्रतापर जाधव यांचे म्हणणे आहे. त्या पृष्ठभूमीवर किमान पक्षी मिळालेली ही मदत शेतकºयांसाठी प्रारंभीकदृष्ट्या दिलासादायक म्हणावी लागले.पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी जिल्ह्याला १३६ कोटी १३ लक्ष ९१ हजार रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. ही मदत शेतीपिके व फळपिकांसाठी दोन हेक्टरमर्यादेत देण्यात येत असून शेती पिकांसाठी आठ हजार रुपये हेक्टरी तर बहुवार्षिक (फळपिके) पिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे.सोबतच जमीन महसुलात सुट व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफीची सवलतही जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाधीत झालेल्या शेतकºयांची संख्या व नुकसानाची व्याप्ती पाहता त्वरेने मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आलेल्या निधीच्या मागणीनुसार शासनस्तरावरून ही मदत मंजूर करण्यात आली आहे. सोबतच ही मदत जिल्हस प्राप्त झाली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दीड महिन्यात २५ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर येत असतानाच राज्य शासाने किमान पक्षी ही मदत उपलब्ध केल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकºयांचे नुकसान मोठे असून आणखी मदत शेतकºयांना केली जावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)१४ लाखांचा जमिन महसूल माफ!बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांचा जवळपास १४ लाख रुपयांचा सामान्य जमीन महसूल यामुळे माफ झाला आहे. त्याचा शेतकºयांना काही प्रमाणात लाभ होणार आहे. जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाखांच्या आसपास शेतकरी असून या शेतकºयांकडून दरवर्षी सुमारे २० रुपयांच्या आसपास सामान्य जमीन महसूल जमा करण्यात येत असतो. तो आता जमा केल्या जाणार नाही. २०१२, २०१३, २०१४ दरम्यान सुमारे ११ लाख ते १४ लाखांच्या आसपास सामान्य जमीन महसूल गोळा केल्या जात होता. तो अंदाज पाहता साधारणत: १४ लाखांच्या आसपास जिल्ह्यातील शेतकºयांचा हा जमीन महसूल माफ झाला आहे. सोबतच शेतकºयांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्कही माफ करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी