शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

१३ लाख नागरिक साथरोगाने बाधित

By admin | Updated: May 12, 2017 08:02 IST

साथरोग नियंत्रण कार्यक्रम ; ४३ नागरिकांचा मृत्यू.

नीलेश शहाकार बुलडाणा : गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ आणि विषमज्वरसारख्या साथरोगाची राज्यात गतवर्षभरात १२ लाख ९६ हजार लोकांना लागन झाली, तर उपचाराअभावी ४३ नागरिकांचा मृत्यू झाला, त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेला साथरोग नियंत्रण कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.मान्सूनपूर्व कालावधीत साथरोग उद्भवल्यास यावरती तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी तसेच पावसाळा कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता उपाययोजना करण्यात येते. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा परिषद, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे नियोजन राबविण्यात येते.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. प्रत्येक नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त करण्यात येऊन या कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांवर लक्ष ठेवले जाते.सर्व स्थानिक प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता करावी. पाणीपुरवठा स्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवाण्यासंदर्भात सूचना देण्यात येते. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनयुक्त टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात येतो; मात्र इतर आरोग्य कार्यक्रमाप्रमाणे साथरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही किंवा आरोग्य कर्मचारी पदनिर्मिती नाही. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कीटकजन्य आजार आणि हिवताप विभागातील कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.