शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तालुक्यात ४ वर्षात ११६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:42 IST

नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.

- सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या निकषानुसार यातील काही मदतीस आत्महत्या पात्र तर काही अपात्र ठरल्या आहेत. परंतु नापिकीमुळे शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांमध्ये ५० वर्षे वयोगटापेक्षा कमी वय असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असून तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाच्या उपाययोजना मात्र शून्य असल्याचे वास्तव आहे.पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. कोरडवाहू व निसर्गाच्या भरवशावर येथील शेतकरी शेती करतो. यामुळे कर्जबाजारी शेतकºयांचा तालुका अशी ओळख नांदुरा तालुक्याची निर्माण झाली आहे. महत्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प पूर्णा नदीवर या तालुक्यात साकारत असला, तरी त्याची २३ वर्षाची संथगती तालुक्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अगोदरच या तालुक्याला खारपाणपट्ट्याचाही शाप आहे. ६३ गावे खारपाणपट्ट्यात येतात. या व इतर कारणामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पयार्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळत आहेत. नांदुरा तालुक्यात गत ४ वर्षांपासून ११६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सन २०१५ या आर्थिक वर्षात २१, २०१६ मध्ये २०, २०१७ मध्ये २३, २०१८ मध्ये ३४ व मे २०१९ पर्यंत १८ शेतकºयांनी मृत्यूला जवळ केले. असे असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.पात्र अपात्रचे निकष लावण्यापलीकडे कोणताही कार्यक्रम नसल्याने व त्याच्यासाठी खास तरतूद केली जात नसल्यामुळे याहीपुढे या तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे वाढतच जाणार असल्याचे दिसते. गत २ ते ३ वर्षांपूर्वी आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता शासनस्तरावरुन तणावग्रस्त शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांच्यासाठी कोणताच कार्यक्रम आखल्या गेला नाही. यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. गत वषार्तील दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत या वषीर्ची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने पेरणीकरिता शेतकºयांना विशेष पॅकेज देण्याच्या साठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याkhamgaonखामगावNanduraनांदूरा