शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीत ११ टक्क्यांची वाढ; पोलिसांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:33 IST

Buldhana Police News जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे.२,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. त्यातच २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. परिणामी, जिल्ह्याची लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात येत्या काळात  दोन टप्प्यात १२,५०० पोलिसांची भरती होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात असून प्रतिएक हजार व्यक्तीमागे जिल्ह्यात अवघा एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नैसर्गिक आपत्ती, निवडणुका व तत्सम कालावधीत पोलिसांवर मोठा ताण येतो. गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळेही पोलिसांवर चांगलाच ताण आलेला आहे. काही पोलीस कर्मचारीही त्यामुळे प्रभावीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलीस दलात २,७३२ पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात २६०० पोलीस कर्मचारीच कार्यरत आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ही ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलिस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळून गुन्हेगारीला आळा घालताना पोलिसांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे शहरी तथा ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार किती पोलिस हवे याचे निकष वेगवेगळे आहे. मात्र आता १९६१ मधील अनुषंगीक निकष बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस दलाकडून कम्युनिटी पोलिसिंगचेही सहकार्य बुलडाणा पोलिस दल घेत आहे. त्या माध्यमातून  जनमानसामध्ये पोलिसांविषयी एक विश्वास निर्माण होऊन गुन्हे रोखण्यास त्याची मदत होत आहे. जिल्हयात पोलिस दलात अधिक सुसुत्रा येण्यासाठी दोन उपविभाग निर्मितीचे प्रस्ताव आहेत.

तुलनेने कमी मनुष्यबळ असले तरी जबाबदारी निश्चित करून गुणात्मक काम करण्यास जिल्हा पोलीस दल प्राधान्य देत आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मधल्या काळात दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात येवून पोलीस दलातील वातावरण मैत्रिपूर्ण ठेवण्यास व पोलिसांचा ताण कमी करण्यास आपण प्राधान्य दिले आहे. यासोबतच वाहनावरील चालकांची रिक्तपदेही भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वाहनांसाठी नवीन टायरचीही मागणी केलेली आहे.- अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस