शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

बुलडाणा जिल्ह्यात १0३ परीक्षा केंद्रे : ३२ हजार ८0९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:59 IST

बुलडाणा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १0३ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ८0९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यामध्ये ३१ हजार ५३८ हे नियमितचे व १ हजार २७१ विद्यार्थी रिपीटर आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभाग सतर्क असून, त्यासाठी दक्षता समिती निर्माण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभाग सक्रिय 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १0३ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ८0९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यामध्ये ३१ हजार ५३८ हे नियमितचे व १ हजार २७१ विद्यार्थी रिपीटर आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभाग सतर्क असून, त्यासाठी दक्षता समिती निर्माण करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, २0 मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३२ हजार ८0९ विद्यार्थी असून, १0३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी बुलडाणा तालुक्यात १५ केंद्रे असून, ३ हजार ७१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३ हजार ५७९ नियमित व १३७ रिपीटर आहेत. चिखली तालुक्यात १३ केंद्रे व ४ हजार ४१७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मेहकर तालुक्यात ८ केंद्रे असून, २ हजार ५५0 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात ६ केंद्रे व १ हजार ५३७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात ९ केंद्रे व २ हजार ९२७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. लोणार तालुक्यात ५ केंद्रे व १ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मोताळा तालुक्यात ५ केंद्रे व २ हजार ४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. मलकापूर तालुक्यात ८ केंद्रे व २ हजार ६३0 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. खामगाव तालुक्यात १२ केंद्रे असून, ४ हजार १७९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. नांदुरा तालुक्यात ६ केंद्र व १ हजार ७४५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. शेगाव तालुक्यात ५ केंद्र व २ हजार ६२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. जळगाव जामोद तालुक्यात ६ केंद्र व २ हजार १४ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. संग्रामपूर तालुक्यात ५ केंद्र असून, १ हजार ४१९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. 

सहा भरारी पथकांची राहणार नजरइयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर यांच्या पथकाचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षाSchoolशाळा