शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

१0 हजार कर्मचार्‍यांचे मानधन रखडले

By admin | Updated: June 30, 2014 02:09 IST

राज्यातील वसतिगृहातील कर्मचार्‍यावर उपासमारीची पाळी; बुलडाणा जिल्ह्यातील १२४ कर्मचार्‍यांचा समावेश.

सिध्दार्थ आराख / बुलडाणा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहात काम करणार्‍या राज्यातील जवळपास १0 हजार ८00 कर्मचार्‍यांचे मागील पाच महिण्यापासून मानधन रखडले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १२४ कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वसतिगृहांतर्गत करण्यात येते. जिल्ह्यात असे ४१ वसतिगृह आहेत. ज्या संस्थेंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येते त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९00 ते ९५0 रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण विभाग देते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ४१ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्या र्थ्यांची प्रति वसतिगृह अशी पटसंख्या आहे. विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मूलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिक्षक, एक मदतनिस आणि एक स्वयंपाकी अशी पदे मंजूर आहेत. मात्र ही पदे मानधन तत्वावर आहेत. गेल्या १0 वषार्पासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. या कर्मचार्‍यांना मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण असा संसाराचा गाडा कसा हकलायचा असा प्रश्न या कर्मचार्‍यापुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणत अंदाजे १0 हजार ८00 कर्मचारी वसतिगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचार्‍यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र हे मानधन मागील पाच महिण्यापासून थकीत ठेवण्यात आले आहे. अद्याप नीधी प्राप्त झाला नसल्याचे समाज कल्याण विभातून रसांगण्यात येते.मागील काळात काही जिल्ह्यात कर्मचारी संघटनेने आंदोलन करून मानधन वेळेवर देण्यात यावे व कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयाकडे मानधनासाठी चकरा माव्या लागत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतिगृहा त रात्रदिवस विद्यार्थ्यांना सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी करीत असून मानधन न मिळाल्यास कर्मचारी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.