शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:48 IST

खामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाराष्ट्रातील दुष्काळ  हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे. दुष्काळ परिषदेत १० ठराव पारीत करण्यात आले असून या ठरावाच्या अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्याकंडे पाठवण्यात येईल. प्रस्तावावर शासन काय उपाययोजना करते, यावर संघटनेची भूमिका ठरवण्यात येईल असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अटाळी येथे आयोजीत दुष्काळ जागर यात्रेचा समारोप रविवारी संध्याकाळी झाला. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम पातोंडे, सरपंच डॉ. दिलिप काटोले, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, शेतकरी आंदोलनाचे सेनानी चंद्रकांत वानखडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, वाशिम जिल्हा परिषद सदस्य गजाननराव अहमदाबादकर, विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार, तालुकाध्यक्ष राजूभाऊ नाकाडे, समाधान भातूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अटाळी येथील श्री. संत भोजने महाराज मंदिरासमोर दुष्कार जागर यात्रेचा समारोप झाला. या दुष्काळ परिषद एकूण १० ठराव पारित करण्यात आले आहेत. यावेळी इतर पदाधिकाºयांनी सुद्धा शेतकºयांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.     

दृष्टीक्षेपात ठराव ... 1. दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा. 2. शेतकºयांना कर्जमुक्त करावे.3. दुष्काळाची व्यापकता मराठवाडा, विदर्भात मोठी असल्याने दुष्काळाचे सरकारी निकष बदलण्यात यावे. 4. चुकीचा हवामान अंदाज वर्तविल्यामुळे झालेल्या नुकसानाची शेतकºयांना हेक्टरी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी.5. जलसंधारणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.6. शेतीअंतर्गत कामे व शेतरस्त्यासह गावतलाव निर्माण कार्याला प्राधान्य देण्यात यावे.7. उद्योगपतींच्या धरतीवर शेतकरी, शेतमजुरांना दिर्घमुदती कर्ज उपलब्ध करून द्यावे.8. शेतकरी, शेतमजुरांवरील सर्व अवास्तव विजबील रद्द अर्थात माफ करावे.9. साठ वर्षांवरील वयोवृध्दांना दुष्काळ अनुदान देण्यात यावे.10. दुष्काळ निवारण्यासाठी तालुका, पं.स. तथा बाजारपेठ स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे आणि त्यासाठी एका संपर्क पालक अधिकाºयाची नियुक्ती करावी.    

(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी