शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:48 IST

जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे. 

बुलडाणा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे. मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या  परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा लागली होती. अखेर ८ जून रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.  दहावीच्या निकालावरच शाळेचे यश अवलंबुन असते. अनेक पालक तर दहावीचा निकाल पाहून आपल्या पाल्याला त्या शाळेत टाकायचे की नाही, हे ठरवतात. त्यामुळे दहावीचा उत्कृष्ट निकाल लागावा, अर्थात १०० टक्के निकालासाठी शाळा कसोशीने प्रयत्न करते. जिल्ह्याचा एकूण निकाल ७७.०७ टक्के लागला आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५१८ शाळांपैकी १० टक्के शाळा म्हणजे ५२ शाळांनी १०० टक्के निकालावर मजल मारली आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, मोताळा चार, चिखली तालुक्यातील १०, देऊळगाव राजा तालुक्यातील पाच, सिंदखेड राजा चार, लोणार दोन, मेहकर दोन, खामगाव नऊ, शेगाव एक, नांदूरा १, मलकापूर दोन, जळगाव तीन व संग्रामपूर तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. अशा जिल्ह्यातील एकूण ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यातील काही शाळा गतवर्षी सुद्धा १०० टक्क्यावर होत्या. १० टक्क्यापर्यंत च्या तीन शाळा जिल्ह्यातील तीन शाळा १० टक्क्यापर्यंत पोहचू शकल्या. मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल अवघा ८.६९ टक्के लागला आहे. तर मेहकर तालुक्यातील शिंगणे विद्यालय खंडाळाचा निकाल ६.८९ टक्के लागला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुलचा निकाल १०.३४ टक्के लागला आहे. चिखली अव्वल दहावीच्या १०० टक्के निकालात चिखली तालुक्यातील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. चिखली तालुक्यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSSC Resultदहावीचा निकालSchoolशाळा