शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग झोपेत

By admin | Updated: May 25, 2017 00:20 IST

शिर्षक वाचून दचकलातं ना? आणि शिर्षकानुसार बातमी वाचायला उत्सूकता लागली असेल. होय, शिक्षण विभाग झोपेतच आहे, ...

अपिलीय अधिकारी जूनेच : चार महिन्यांचा कालावधी लोटलाप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिर्षक वाचून दचकलातं ना? आणि शिर्षकानुसार बातमी वाचायला उत्सूकता लागली असेल. होय, शिक्षण विभाग झोपेतच आहे, असेच सध्याचे चित्र येथे आहे. चार महिन्यापूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथ.) म्हणून रविकांत देशपांडे रूजू झालेत. मात्र, शिक्षण विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या माहिती अधिकाराचे अपिलीय अधिकारी म्हणून आजही तत्कालीन शिक्षणाधिकारी ए. व्ही. परिहार यांचेच नाव आहे. त्यामुळे श्यू..... शिक्षण विभाग झोपेत आहे, असेच म्हणावे लागेल.जिल्हा परिषदच्या इमारतीत दुसऱ्या माळ्यावर शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. दररोज नवनविन फाईल्स, व नानाविध कामांचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांना मागिल काही वर्षांपासून नियमित शिक्षणाधिकारी प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रभारींवरच येथील शिक्षण विभागाचे काम सुरू आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांच्याकडे काही दिवस प्राथमिक विभागाचा प्रभार देण्यात आला होता. त्यांचे वर्धा येथे स्थानांतरण झाल्यानंतर प्राथमिक विभागाचा प्रभार डायटचे प्राचार्य अभयसिंग परिहार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाची प्रभारींची परंपरा सध्याही कायम आहे.परिहार यांना नियमानुसार प्रभार देता येत नसतानाही त्यांना प्रशासकीय जबाबदारी सोपविण्याचा अफलातून प्रकार जिल्हा परिषदमध्ये घडला. याला जिल्हा परिषद सभागृहात विरोध झाला, मात्र एैकेल कोण? नागपूर येथील रविकांत देशपांडे यांची भंडारा स्थानांतरण झाल्याने परिहार यांच्याकडून त्यांनी प्रभार घेतला. देशपांडे हे भंडारा येथे २७ जानेवारी २०१७ ला रूजू झालेत. याला आता चार महिन्यांचा कालावधी लोटत आहे. या चार महिन्यात प्राथमिक शिक्षण विभागात मोठे फेरबदल झालेत. काही निर्णयामुळे वादळ निर्माण झाले, यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वादळ घोंगावत आहे.अशा या शिक्षण विभागाच्या प्रवेशद्वारालगत केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ संबंधी बोर्ड लागला आहे. या बोर्डवर आजही अपिलीय अधिकारी म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी ए. व्ही. परिहार यांचे नाव लिहिलेले आहे. तर महिती अधिकारी म्हणून जनमाहिती अधिकारी तथा कक्षाधिकारी नलीनी डोंगरे व सहायक महिती अधिकारी म्हणून अधिक्षक आर. आर. तरोणे यांचे नाव लिहिलेले आहे. वास्तविकतेत रविकांत देशपांडे यांना येथे रूजू होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आहे. त्यामुळे अपिलीय अधिकारी म्हणून परिहार यांच्या ऐवजी देशपांडे यांचे नाव लिहिने आवश्यक आहे. मात्र, झोपेत असलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची जाणीवच नाही, ही खरी शोकांतिका आहे. प्रवेशद्वारातच गोंधळप्रवेशद्वाराच्या एकाबाजूला माहिती अधिकाराच्या बोर्डवर अपिलीय अधिकारी म्हणून परिहार यांचे नाव तर दुसऱ्या बाजूला प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून आर. पी. देशपांडे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा मोठा गोंधळ उडतो. याच प्रवेशद्वारातून दररोज शिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, अधिक्षक यांच्यासह येथील कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे सर्व शुभचिंतक आवागमन करता. त्यामुळे यातील कुणाचेच याकडे लक्ष जावू नये, हे आश्चर्यम्चं म्हणावे लागेल.जबाबदारी कुणाची?शिक्षण विभागातील सर्व कामे शिक्षणाधिकारी यांनी केलीच पाहिजे, असे नाही. कार्यालयाचा व्याप जास्त असल्याने येथे कक्षाधिकारी, अधिक्षक यांची नियुक्ती केली असून यांच्याकडे कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे काही छोट्यामोठ्या बाबींकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येथे. मात्र, या सर्वांवर शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. याबाबत सर्व एकमेकांकडे अंगूलीनिर्देश करून स्वत:च्या जबाबदारीतून सुटण्याचा प्रयत्न करीत आहेत.