शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तुडूंब भरलेल्या प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत.

ठळक मुद्देतर तीव्र टंचाई : नियोजनासाठी टंचाई आराखड्याचा आधार हवा

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : ल्ह्यिात यंदा दमदार पावसाने सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाण्याची कुठेही टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. त्यामुळे उन्हाळा आला की, अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यासाठी पाणीटंचाईच्या कृती आराखड्याचा अभ्यास करून नियोजन करण्याची गरज आहे.भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून इतर पाण्याबाबत कोणतेही नियोजन करीत नाही. पाटबंधारे विभाग सिंचनासाठी पाणी सोडते, परंतु त्या पाण्याचेही कोणते नियोजन नसते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही.आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात पाणीेटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येते. भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर संबंधित विभागाचा अभिप्राय घेतला जातो. नंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम स्वरुप दिले जाते. दरवर्षीू ही प्रक्रिया पार पाडली जाते.त्यावेळी प्रकल्पाच्या पाण्याचा विचार केला जातो. यावर्षी तुडूंब भरले असतानाही कुठेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे अगदी नदीतिरावरील गावांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होते. त्यामुळे या पाण्याचा सदुपयोग करून पिण्यासोबतच शेतकºयांना सिंचनासाठी देण्याची गरज आहे. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष ेदेऊन नियोजनाची गरज आहे.उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायीलाखनी तालुक्यातील पागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मांगली बांध, मचारणा, जेवनाळा, कवडसी, खैरी आदी गावात याचा प्रत्यय आला. १२ पंपापैकी तीन पंपाने पाणी उपसा करून एका पाण्याने शेती धोक्यात येते ती टाळली जाऊ शकते. मार्चनंतर हे पाणी नदीनाल्यात सोडल्यास पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार नाही. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प