शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
4
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
5
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
6
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
7
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
8
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
9
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
11
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
12
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
13
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
14
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
15
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
16
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
17
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
18
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
19
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
20
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

तुडूंब भरलेल्या प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत.

ठळक मुद्देतर तीव्र टंचाई : नियोजनासाठी टंचाई आराखड्याचा आधार हवा

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : ल्ह्यिात यंदा दमदार पावसाने सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाण्याची कुठेही टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. त्यामुळे उन्हाळा आला की, अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यासाठी पाणीटंचाईच्या कृती आराखड्याचा अभ्यास करून नियोजन करण्याची गरज आहे.भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून इतर पाण्याबाबत कोणतेही नियोजन करीत नाही. पाटबंधारे विभाग सिंचनासाठी पाणी सोडते, परंतु त्या पाण्याचेही कोणते नियोजन नसते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही.आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात पाणीेटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येते. भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर संबंधित विभागाचा अभिप्राय घेतला जातो. नंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम स्वरुप दिले जाते. दरवर्षीू ही प्रक्रिया पार पाडली जाते.त्यावेळी प्रकल्पाच्या पाण्याचा विचार केला जातो. यावर्षी तुडूंब भरले असतानाही कुठेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे अगदी नदीतिरावरील गावांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होते. त्यामुळे या पाण्याचा सदुपयोग करून पिण्यासोबतच शेतकºयांना सिंचनासाठी देण्याची गरज आहे. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष ेदेऊन नियोजनाची गरज आहे.उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायीलाखनी तालुक्यातील पागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मांगली बांध, मचारणा, जेवनाळा, कवडसी, खैरी आदी गावात याचा प्रत्यय आला. १२ पंपापैकी तीन पंपाने पाणी उपसा करून एका पाण्याने शेती धोक्यात येते ती टाळली जाऊ शकते. मार्चनंतर हे पाणी नदीनाल्यात सोडल्यास पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार नाही. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प