शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

तुडूंब भरलेल्या प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत.

ठळक मुद्देतर तीव्र टंचाई : नियोजनासाठी टंचाई आराखड्याचा आधार हवा

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : ल्ह्यिात यंदा दमदार पावसाने सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहेत. पाण्याची कुठेही टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. परंतु या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. त्यामुळे उन्हाळा आला की, अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यासाठी पाणीटंचाईच्या कृती आराखड्याचा अभ्यास करून नियोजन करण्याची गरज आहे.भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवून इतर पाण्याबाबत कोणतेही नियोजन करीत नाही. पाटबंधारे विभाग सिंचनासाठी पाणी सोडते, परंतु त्या पाण्याचेही कोणते नियोजन नसते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही.आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात पाणीेटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येते. भूजल सर्वेक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर संबंधित विभागाचा अभिप्राय घेतला जातो. नंतर विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम स्वरुप दिले जाते. दरवर्षीू ही प्रक्रिया पार पाडली जाते.त्यावेळी प्रकल्पाच्या पाण्याचा विचार केला जातो. यावर्षी तुडूंब भरले असतानाही कुठेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे अगदी नदीतिरावरील गावांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचे लाखो रुपये खर्च होते. त्यामुळे या पाण्याचा सदुपयोग करून पिण्यासोबतच शेतकºयांना सिंचनासाठी देण्याची गरज आहे. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष ेदेऊन नियोजनाची गरज आहे.उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायीलाखनी तालुक्यातील पागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मांगली बांध, मचारणा, जेवनाळा, कवडसी, खैरी आदी गावात याचा प्रत्यय आला. १२ पंपापैकी तीन पंपाने पाणी उपसा करून एका पाण्याने शेती धोक्यात येते ती टाळली जाऊ शकते. मार्चनंतर हे पाणी नदीनाल्यात सोडल्यास पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार नाही. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प