शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यातील राज्य व ग्रामीण मार्गांना अर्थबजेटात मिळाला शून्य निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:28 IST

ग्रामीण वाट झाली खडतर : शासनाचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : राज्य व ग्रामीण रस्त्यांना निधीची वानवा आहे. केवळ चार टक्के निधीचे नियोजन झाल्याने रस्त्याचे बांधकाम किंवा दुरुस्ती संकटात सापडली आहेत. विकासाची गंगा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा शब्द निवडणुकीत राज्यकर्त्यांनी दिला होता. योगायोगाने केंद्रात व राज्यात महायुतीची एकाच पक्षाची सत्ता स्थापन झाली. विकासाची गंगा आता ग्रामीण भागातही प्रवाहित राहील, अशी आशा वाटली. मात्र, जिल्ह्याच्या रस्ता विकासाकरिता निधीचा वानवा दिसल्याने ग्रामीण रस्त्यांची वाट कायमच खडतर दिसत आहे.

पालांदूर बायपास, पालांदूर मन्हेगाव, वाकल - हरदोली, पालांदूर -घोडेझरी, सायगाव - सानगाव, जेवनाळा ते मचारना आदींसह पाणंद रस्ते आजही निधीविना प्रलंबित आहेत. त्याच अवस्थेत वेदना सहन करत आहेत. निधीची व्यवस्था नसल्याने अधिकारी, नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी हातावर हात देऊन ताटकळत बसले आहेत. जिल्हा परिषदेलाही रस्ते बांधकामासाठी निधी मिळत नसल्याने रस्त्यांची पूर्णतः वाट लागली आहे. 

पालांदूर व परिसरातील रस्त्यांचीच व्यथा नसून जिल्ह्यातीलही इतर राज्यस्तरीय ग्रामीण रस्त्यांचीही हीच अवस्था जिल्हावासीयांना अनुभवायला मिळाली आहे. जिल्ह्यात मातब्बर राजकारणी असून, अर्थबजेटात जिल्ह्यावर अन्याय झाल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणावा की राजकीय कुरघोडी म्हणावी, असा प्रश्न समाजात चर्चेत आहे.

नागरिकांना ही शिक्षा कशाची ?पालांदूर बायपाससाठी ३.९० कोटी रुपयांचे नियोजन अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केले होते. मात्र, त्यातही निराशाच पदरी पडली आहे. पालांदूर येथील अंतर्गत रस्ता व मुख्य रस्त्यावरील गटारनाल्याही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक विभागात निधीचा वानवा असल्याने काम बंद पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना ही शिक्षा कशाची? असा प्रश्न सहजतेने पुढे येत आहे.

कोट्यवधींचे देयक थकलेपालांदूर मन्हेगाव जैतपूर हा राज्य मार्ग आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला. त्यावेळी त्याला निधीसुद्धा नियोजित करण्यात आला. मात्र, टप्प्याटप्प्याने काम सुरू असताना अंतिम टप्प्यातील निधी अजूनही प्रतीक्षेतच थांबला आहे. अंदाजे ३ किमी रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असून, खडीकरण उखडले आहे. यावरील अंदाजे २.७५ कोटी रुपये कंत्राटदाराचे थकले आहेत.

निवेदनातून वास्तवपालांदूर व मन्हेगाव येथील जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वास्तविकतेची जाणीव करून दिली आहे. तर उपविभागीय अभियंता दीनदयाल मटाले म्हणतात की, बांधकामाकरिता निधीच नाही तर... काम कुठून होणार!

टॅग्स :bhandara-acभंडाराroad transportरस्ते वाहतूक