शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बिघाड दुरूस्ती करणे जीवावर बेतले; रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 13:37 IST

चिचोली शिवारातील घटना

लाखांदूर (भंडारा) : बिघाड दुरूस्त करण्यासाठी वीज रोहित्रावर चढलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिचोली-भागडी शिवारात शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सिंचन खोळंबल्याने बिघाड दुरूस्तीसाठी रोहित्रावर चढणे या तरुणाच्या जीवावर बेतले.

शरद यादो धोटे (३२, रा. भागडी) असे मृताचे नाव आहे. त्याचे चिचोली - भागडी शिवारात दोन एकर शेत आहे. शेत सिंचनासाठी कृषी वीजपंप आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शरद पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला. मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंप सुरू न झाल्याने वीज पुरवठ्यात बिघाड झाला असावा, असे त्याला वाटले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तो शेतातील रोहित्राजवळ पोहोचला. यावेळी शरदने रोहित्राचा वीजपुरवठा बंद केला आणि वर चढला. मात्र, काही कळायच्या आत त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.

रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना, महावितरण कंपनीसह पोलिसांना देण्यात आली. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज उईके, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे, पोलीस नायक दिलीप भोयर, सुभाष शहारे, अंमलदार अनिल राठोड, संदीप रोकडे यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूbhandara-acभंडारा