शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवजड वाहनांना तुमसरात बिनधास्त ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:53 IST

तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआंतरराज्यीय मार्ग शहरातून : बायपास रस्त्याला रेल्वेचा अडथळा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तुमसर शहर रेल्वे ट्रॅकमुळे दोन भागात विभागले आहे. श्रीराम नगर हे शहराचे प्रवेशद्वार आहे. अर्धी लोकसंख्या श्रीराम नगर, विनोबा नगर, दुर्गा नगर, ते भंडारा मार्गावर नागरिकांची घरे आहेत. भंडारा-तुमसर राज्य मार्ग शहरापर्यंत येतो पुढे हा रस्ता कटंगी व वारासिवनी (मध्यप्रदेश) कडे जातो. सदर रस्त्यावरुन चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. यात रेती, मॅग्नीज तथा इतर साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. सकाळी ९.३० ते १२ व सायंकाळी ४ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत या रस्त्यावरुन जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बसस्थानक, बँका, शाळा, कॉलेज, खाजगी रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय मार्गावर आहे.विनोबा भावे मार्गावर देव्हाडी मार्गाने भंडारा मार्गावर जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु वारासिवनी व कटंगी कडून येणारा वाहनाला बायपास रस्ता नाही. सिहोरा ते मºहेगाव रस्ता असा बायपास रस्ता मंजूर होणार आहे. परंतु शेवटी ही वाहतूकही आयटीआय मार्गे शहरातून जाणार आहे. मºहेगाव रस्ता ते हसारा दरम्यान रेल्वे ट्रॅक आहे. दुसरा बायपास रस्त्याला रेल्वे ट्रॅक अडसर ठरत असल्याची माहिती आहे. हा अडथळा दूर झाल्याशिवाय शहरातूनच जड वाहतूकीचे ट्रक धावणार आहेत.दिवसेंदिवस शहरात लोकसख्येसोबत वाहनांची संख्या वाढत आहे. आता सुरक्षित प्रवासाकरिता शहराला बायपास रस्त्याची नितांत गरज आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४५ हजार आहे. भंडारा रस्त्यावर तुमसर शहर वाढत आहे. शहरातून ट्रकांची एन्ट्री दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. परंतु आंतरराज्यीय मार्गाला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचाही नाईलाज आहे.शहरातून जड वाहतुकीदरम्यान पालकांना आपल्या पाल्यांची नेहमी चिंता सतविते. शहरातील रस्त्यावरुन ट्रक वाहतुक मात्र मर्यादित वेगात राहते. शेवटी अपघात वेळ आणि काळ सांगून येत नाही. बायपास रस्ता हाय एकमेव पर्याय येथे आहे.