शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

अवजड वाहनांना तुमसरात बिनधास्त ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:53 IST

तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देआंतरराज्यीय मार्ग शहरातून : बायपास रस्त्याला रेल्वेचा अडथळा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहराला बायपास रस्ता नाही. त्यामुळे तुमसर- कटंगी तथा वाराशिवनी आंतराज्यीय रस्ता शहरातून जातो. मागील काही वर्षात या रस्त्यावर जड वाहतूक वाढती भर शहरातील मुख्य रस्त्यावरुन यमरुपी ट्रकांची सर्रास एन्ट्री होत आहे. सकाळी व सायंकाळच्या सुमारास येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. श्रीमंत नगरी म्हणून नोंद असलेल्या शहराकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तुमसर शहर रेल्वे ट्रॅकमुळे दोन भागात विभागले आहे. श्रीराम नगर हे शहराचे प्रवेशद्वार आहे. अर्धी लोकसंख्या श्रीराम नगर, विनोबा नगर, दुर्गा नगर, ते भंडारा मार्गावर नागरिकांची घरे आहेत. भंडारा-तुमसर राज्य मार्ग शहरापर्यंत येतो पुढे हा रस्ता कटंगी व वारासिवनी (मध्यप्रदेश) कडे जातो. सदर रस्त्यावरुन चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. यात रेती, मॅग्नीज तथा इतर साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. सकाळी ९.३० ते १२ व सायंकाळी ४ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत या रस्त्यावरुन जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बसस्थानक, बँका, शाळा, कॉलेज, खाजगी रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय मार्गावर आहे.विनोबा भावे मार्गावर देव्हाडी मार्गाने भंडारा मार्गावर जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु वारासिवनी व कटंगी कडून येणारा वाहनाला बायपास रस्ता नाही. सिहोरा ते मºहेगाव रस्ता असा बायपास रस्ता मंजूर होणार आहे. परंतु शेवटी ही वाहतूकही आयटीआय मार्गे शहरातून जाणार आहे. मºहेगाव रस्ता ते हसारा दरम्यान रेल्वे ट्रॅक आहे. दुसरा बायपास रस्त्याला रेल्वे ट्रॅक अडसर ठरत असल्याची माहिती आहे. हा अडथळा दूर झाल्याशिवाय शहरातूनच जड वाहतूकीचे ट्रक धावणार आहेत.दिवसेंदिवस शहरात लोकसख्येसोबत वाहनांची संख्या वाढत आहे. आता सुरक्षित प्रवासाकरिता शहराला बायपास रस्त्याची नितांत गरज आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४५ हजार आहे. भंडारा रस्त्यावर तुमसर शहर वाढत आहे. शहरातून ट्रकांची एन्ट्री दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. परंतु आंतरराज्यीय मार्गाला दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचाही नाईलाज आहे.शहरातून जड वाहतुकीदरम्यान पालकांना आपल्या पाल्यांची नेहमी चिंता सतविते. शहरातील रस्त्यावरुन ट्रक वाहतुक मात्र मर्यादित वेगात राहते. शेवटी अपघात वेळ आणि काळ सांगून येत नाही. बायपास रस्ता हाय एकमेव पर्याय येथे आहे.