शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

तुमसरात ६५२ हेक्टरमध्ये नुकसान

By admin | Updated: March 17, 2015 00:40 IST

तालुक्यात ४५ मि.मी. अवकाळी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. ५० टक्केच्या

तीन विभागांनी केले संयुक्त पंचनामे : नुकसानभरपाई मिळणार नाही, लोकप्रतिनिधी गप्पतुमसर : तालुक्यात ४५ मि.मी. अवकाळी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. ५० टक्केच्या आत पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामा करणाऱ्या पथकात तहसील प्रशासन महसूल, कृषि विभाग तथा संबंधित गावच्या ग्रामसेवकांचा समावेश आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले.२८ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. तुमसर तालुक्यात ६५२ हेक्टर शेतीतील रब्बी पिकांचे यात हरभरा, लाखोरी, गहू इत्यादी पिकांचा त्यात समावेश आहे. पंचनामे करण्यात आले. गव्हाची लागवड सुमारे ७८७ हेक्टरमध्ये करण्यात आली.उन्हाळी धान पिकाची लागवड १३६५ हेक्टरमध्ये ५ मार्चपर्यंत केली होती. सध्या लागवड करणे सुरू आहे. तुमसर तालुक्यात ४० मि.मी. पावसाची नोंद आहे. नुकसान भरपाई करीता सुमारे ६५ मि.मी. पावसाची नोंद गरजेची आहे. पंचनामा करणाऱ्या पथकाने ५० टक्केच्या आत नुकसान भरपाईचे पंचनामे केले आहेत. त्यामुळे तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी माहिती आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.एखाद्या पिकाची कापणी झाली व ते पीक शेतात पडून असले तरी त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाई मिळण्याकरिता ६५ मि.मी. पावसाची नोंद असेण आवश्यक असून ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले तरच नुकसान भरपाई शासनाकडून प्राप्त होते. केंद्र शासनाचाही हाच नियम असल्याची माहिती आहे. वास्तविक ५० टक्केच्यावर येथे नुकसान पीकांचे झाले आहे. पंचनामे केल्यावर त्याची दुसरी यादी तयार करणे त्रासाचे असल्याने ५० टक्केच्या आत पंचनामे शासकीय यंत्रणा करीत असल्याचे समजते.शेतकऱ्यांचे प्रतिनिधी येथे मूग मिळून गप्प आहे. (तालुका प्रतिनिधी)पावसामुळे पिकांचे नुकसानपवनी : तालुक्यात रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, वटाना, मिरची, उडीद, मुंग, कापूस आदी पिके पावसात भिजले आहेत. पावसामुळे आंब्यांचा मोहर गळाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. जनावरांचे वैरण पावसात भिजले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी कोणते ना कोणते आस्माणी संकट येत राहते. यावर्षी बरोबर पाऊस न पडल्यामुळे खरीपाचे पीक झाले नाही. या परिस्थितीतून मार्ग काढत कर्ज घेवून रब्बी पिकाची पेरणी केली. पिक घरी नेण्याच्या स्थितीत असताना दुसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.गव्हाचे पिक वाळून कापनीला आले आहे. पिक शेतात उभे आहे. पण हे गव्हाचे पिक पुर्णपणे पावसात सापडल्यामुळे या पिकाच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. तिच स्थिती हरभरा, वटाना, मिरची, उडीद, मुग, कापूस आदींचीही झाली आहे. काहीही ध्यानी मनी नसताना पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीही करता आले नाही. काही शेतकऱ्यांनी पुंजने ताडपत्रीने झाकून ठेवले होते. पण या ताडपत्र्याही अपुऱ्या पडल्या.यावर्षी आंब्यांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. त्यामुळे तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्पादन होणे अपेक्षित होते. पण कालच्या व यापुर्वीच्या आलेल्या अवकाळी पावसाने आंबांच्या झाडाचा मोहोर पुर्णत: झडला आहे. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होवून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. (शहर प्रतिनिधी)