शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:32 IST

जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे.

ठळक मुद्देनागपुरातून निघाले मजल दरमजल करीत मजुरांचे जत्थे

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वितभर पोटासाठी चिल्या पिल्यांसह महानगरात राबराब राबणाऱ्या मजुरांवर कोरोनाने महासंकट आणले आहे. हाताला काम नसल्याने मजूर आपल्या मूळ गावाकडे धाव घेत आहे. परंतु जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. गत दोन दिवसांपासून भंडारामार्गे गेलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी काही सहृदय मंडळी धावून आली.गावात काम नसल्याने शेकडो मजूर महानगराकडे धाव घेतात. आपल्या कुटुंबासह त्याच ठिकाणी राहून मिळेल ते काम करतात. हजारो मजूर महानगरात राबताना दिसतात. मात्र संकटाच्या काळात या मजुरांसाठी मात्र कुणी धावून येत नाही. याचा प्रत्येक आता कोरोना संसर्गाच्या निमित्ताने येवू पाहत आहे. मध्यप्रदेशातील हजारो मजूर विविध कामाच्या निमित्ताने नागपूरात राहतात. आता कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निश्चय केला. परंतु गावाला जाण्यासाठी ना रेल्वे ना एसटी बस. खासगी वाहनधारकांचीही विनवनी केली त्यांनीही नकार दिला. शेवटी येथे उपाशी मरण्यापेक्षा आपल्या जन्मभूमीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. आपले बिºहाड उचलून ही मंडळी नागपूरहून मजल दरमजल करीत राष्ट्रीय महामागार्ने गावाकडे कूच करीत आहे. गुरूवारी असाच एक ३० ते ३५ मजुरांचा जत्था भंडारामार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाला. काही मजुरांनी नागपुरातून सायकली मिळवून त्याने प्रवास सुरू केला आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करीत ही मंडळी गाव गाठत आहे. भंडारा शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नास्त्याची व्यवस्था केली. तुमसर पोलिसांच्या मदतीने त्यांना भोजन देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भंडारात दाखल झालेल्या काही मजूरांना येथील एका वसतीगृहात मुक्कामी ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.या मजुरांसोबत त्यांची मुले, बायका आहे. डोक्यावर प्रत्येकाच्या संसाराचे ओझे आहे. ते घेवून ही मंडळी पाय दुखेस्तोवर चालत आहे. कधी एकदा गावात पोहोचतो, अशी त्यांची अवस्था आहे. प्रचंड हाल सोसत ही मंडळी कोरोनाच्या भीतीने गावाकडे निघाली आहे.विद्यार्थ्यांचेही हालनागपूरसह महानगरात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने ही मंडळी तेथेच अडकून पडली आहे. मेस बंद, घराबाहेर काढण्यासाठी घरमालकाचा तगादा, अशा समस्या झेलत आहेत. त्यातील काही विद्यार्थी तर चक्क पदयात्रा करत आपल्या गावाकडे निघाल्याचे दिसत आहे. नागपूरवरून गोंदिया जिल्ह्यातील काही विद्यार्थी शनिवारी सकाळी भंडारा शहरातून मार्गक्रमण करीत होते. रस्ते माहीत नसल्याने रस्त्यावर भेटणाऱ्यांना माहिती विचारत होते. अशा विद्यार्थ्यांचीही भोजनाची व्यवस्था काही दानशूर मंडळींनी करून त्यांना मार्गस्थ केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस