शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Corona Virus in Bhandara; मजुरांचा अन्न पाण्याशिवाय शेकडो किलोमीटर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:32 IST

जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे.

ठळक मुद्देनागपुरातून निघाले मजल दरमजल करीत मजुरांचे जत्थे

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वितभर पोटासाठी चिल्या पिल्यांसह महानगरात राबराब राबणाऱ्या मजुरांवर कोरोनाने महासंकट आणले आहे. हाताला काम नसल्याने मजूर आपल्या मूळ गावाकडे धाव घेत आहे. परंतु जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही, गाठीला पैसा नाही, सोबत खाण्यापिण्याचीही सोय नाही, अशा स्थितीत शेकडो मजूर मजल दरमजल करीत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतात. काही मजूर सायकलने गाव गाठत आहे. गत दोन दिवसांपासून भंडारामार्गे गेलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी काही सहृदय मंडळी धावून आली.गावात काम नसल्याने शेकडो मजूर महानगराकडे धाव घेतात. आपल्या कुटुंबासह त्याच ठिकाणी राहून मिळेल ते काम करतात. हजारो मजूर महानगरात राबताना दिसतात. मात्र संकटाच्या काळात या मजुरांसाठी मात्र कुणी धावून येत नाही. याचा प्रत्येक आता कोरोना संसर्गाच्या निमित्ताने येवू पाहत आहे. मध्यप्रदेशातील हजारो मजूर विविध कामाच्या निमित्ताने नागपूरात राहतात. आता कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निश्चय केला. परंतु गावाला जाण्यासाठी ना रेल्वे ना एसटी बस. खासगी वाहनधारकांचीही विनवनी केली त्यांनीही नकार दिला. शेवटी येथे उपाशी मरण्यापेक्षा आपल्या जन्मभूमीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. आपले बिºहाड उचलून ही मंडळी नागपूरहून मजल दरमजल करीत राष्ट्रीय महामागार्ने गावाकडे कूच करीत आहे. गुरूवारी असाच एक ३० ते ३५ मजुरांचा जत्था भंडारामार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाला. काही मजुरांनी नागपुरातून सायकली मिळवून त्याने प्रवास सुरू केला आहे. शेकडो किलोमीटर प्रवास करीत ही मंडळी गाव गाठत आहे. भंडारा शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नास्त्याची व्यवस्था केली. तुमसर पोलिसांच्या मदतीने त्यांना भोजन देण्यात आले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भंडारात दाखल झालेल्या काही मजूरांना येथील एका वसतीगृहात मुक्कामी ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.या मजुरांसोबत त्यांची मुले, बायका आहे. डोक्यावर प्रत्येकाच्या संसाराचे ओझे आहे. ते घेवून ही मंडळी पाय दुखेस्तोवर चालत आहे. कधी एकदा गावात पोहोचतो, अशी त्यांची अवस्था आहे. प्रचंड हाल सोसत ही मंडळी कोरोनाच्या भीतीने गावाकडे निघाली आहे.विद्यार्थ्यांचेही हालनागपूरसह महानगरात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने ही मंडळी तेथेच अडकून पडली आहे. मेस बंद, घराबाहेर काढण्यासाठी घरमालकाचा तगादा, अशा समस्या झेलत आहेत. त्यातील काही विद्यार्थी तर चक्क पदयात्रा करत आपल्या गावाकडे निघाल्याचे दिसत आहे. नागपूरवरून गोंदिया जिल्ह्यातील काही विद्यार्थी शनिवारी सकाळी भंडारा शहरातून मार्गक्रमण करीत होते. रस्ते माहीत नसल्याने रस्त्यावर भेटणाऱ्यांना माहिती विचारत होते. अशा विद्यार्थ्यांचीही भोजनाची व्यवस्था काही दानशूर मंडळींनी करून त्यांना मार्गस्थ केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस