शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

बावनथडी धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात ख्याती आहे. तलावांचा जिल्ह्यातील बावनथडी धरण परिसरातील ३३ गावांमध्ये ३३ कोटींची पाणीपुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेली आहे.

तुमसर : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात ख्याती आहे. तलावांचा जिल्ह्यातील बावनथडी धरण परिसरातील ३३ गावांमध्ये ३३ कोटींची पाणीपुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेली आहे. याठिकाणी जलवाहिन्यांची कामे झालेली असली तरी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळाले नाही. परिणामी कंत्राटदाराने मजुरांना पैसे न मिळाल्यामुळे काम बंद झाले, परिणामी ही योजना रखडली.महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागामार्फत गोबरवाही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सुरुवात १५ वर्षापुर्वी झाली होती. या योजनेला बावनथडी धरणातून पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सितेकसा ते गोबरवाहीपर्यंत जलवाहिन्यांची कामे करण्यात आली. काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. गोबरवाही परिसरातील ३३ गावांना या योजनेतून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. योजनेचे इंटकवेल, जॅकवेल, पाणी शुध्दीकरण केंद्राची कामे झाली आहेत. परंतु येथील कंत्राटदाराला शासनाकडून कामाचे बील अगदी वेळेवर देण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, या कंत्राटदाराने मजुरांना मजूरी न दिल्यामुळे त्यांनी ही कामे बंद केली. या योजनेच्या जलवाहीन्यांची कामे दहा वर्षीपुर्वी झाली आहेत. सध्या या योजनेची केवळ दहा टक्के कामे शिल्लक आहेत. या योजनेत समाविष्ट गावात जलकुंभसुध्दा तयार झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर, साकोली या तालुक्यातील अशा योजना कार्यान्वीत झाल्या आहेत. परंतु, गोबरवाही पाणीपुरवठा योजनेला अजूनही प्रतिक्षाच आहे. येथे धरणात मुबलक जलसाठा असूनही पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना कोरडीच आहे. (तालुका प्रतिनिधी)