शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बावनथडी धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात ख्याती आहे. तलावांचा जिल्ह्यातील बावनथडी धरण परिसरातील ३३ गावांमध्ये ३३ कोटींची पाणीपुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेली आहे.

तुमसर : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात ख्याती आहे. तलावांचा जिल्ह्यातील बावनथडी धरण परिसरातील ३३ गावांमध्ये ३३ कोटींची पाणीपुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेली आहे. याठिकाणी जलवाहिन्यांची कामे झालेली असली तरी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळाले नाही. परिणामी कंत्राटदाराने मजुरांना पैसे न मिळाल्यामुळे काम बंद झाले, परिणामी ही योजना रखडली.महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागामार्फत गोबरवाही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सुरुवात १५ वर्षापुर्वी झाली होती. या योजनेला बावनथडी धरणातून पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सितेकसा ते गोबरवाहीपर्यंत जलवाहिन्यांची कामे करण्यात आली. काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. गोबरवाही परिसरातील ३३ गावांना या योजनेतून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. योजनेचे इंटकवेल, जॅकवेल, पाणी शुध्दीकरण केंद्राची कामे झाली आहेत. परंतु येथील कंत्राटदाराला शासनाकडून कामाचे बील अगदी वेळेवर देण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, या कंत्राटदाराने मजुरांना मजूरी न दिल्यामुळे त्यांनी ही कामे बंद केली. या योजनेच्या जलवाहीन्यांची कामे दहा वर्षीपुर्वी झाली आहेत. सध्या या योजनेची केवळ दहा टक्के कामे शिल्लक आहेत. या योजनेत समाविष्ट गावात जलकुंभसुध्दा तयार झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर, साकोली या तालुक्यातील अशा योजना कार्यान्वीत झाल्या आहेत. परंतु, गोबरवाही पाणीपुरवठा योजनेला अजूनही प्रतिक्षाच आहे. येथे धरणात मुबलक जलसाठा असूनही पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना कोरडीच आहे. (तालुका प्रतिनिधी)