शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

निधीअभावी सिंदपुरी तलावाचे काम रखडले

By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST

तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असलेल्या सिंदपुरी येथील मामा तलावाचा विकास कृती आराखडा असणारा अडीच कोटीचा प्रस्ताव शासन दरबारात सादर करण्यात आलेला आहे.

अडीच कोटींचा प्रस्ताव : राजकीय पुढारी निधी खेचून आणतील काय?चुल्हाड (सिहोरा) : तुमसर - बपेरा राज्य मार्गावर असलेल्या सिंदपुरी येथील मामा तलावाचा विकास कृती आराखडा असणारा अडीच कोटीचा प्रस्ताव शासन दरबारात सादर करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप निधी प्राप्त झाले नसल्याने विकास कामे रखडली आहेत.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील ३ हजार लोकवस्तीच्या सिंदुपरी गावात १७ हेक्टर आर जागेत खाजगी आणि शासकीय तलाव आहे. यात शासनाची ४ हेक्टर आर सिंमाकित क्षेत्र आहे. या तलावात सिंदपुरी, मोहाडी खापा, मांगली, टेमनी आदी गावातील शेतकऱ्यांची शेती असून ६०० एकर जागेत तलावाची सिंचन क्षमता आहे. पावसाळ्यात तलावात पाणी अडविण्यात येत आहे. पावसाळा ओसरताच पाण्याची गरज भासल्यास शेतकरी पाण्याचे वाटप करीत आहेत. दरम्यान जुलै २०१४ या महिन्यात तलावाची पाड फुटल्याने हा तलाव आणि गाव चर्चेत आलेला आहे. तलावातील पाणी गावात शिरल्याने ११० घरे प्रभावित झाली आहेत. तर अनेक घरांचे नुकसान झाले.तब्बल ४८ तास तलावाचे पाणी गावात होते. यामुळे पाणी ओसरताच अनेक घरे भुईसपाट झाली तर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. उभा धानपिक या पाण्यात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावा लागला. जिल्हा परिषद तथा स्थानिकस्तर या दोन विभागाच्या लघु पाठबंधारे विभागात जबाबदारी स्विकारणे वरून वाद निर्माण झाला. गावकऱ्याचे संसार उघड्यावर असताना विभागाने भांडण जुंपल. गावकऱ्याची सोय जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिरात वास्तव्यासाठी करण्यात आली. गावकऱ्यांना शासकीय मदतीसाठी सभापती कलाम शेख यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.महसूल विभागाची मदत, खाजगी स्वयंसेवी संस्था यांची मदत गावातील बेघर कुटूंबियांना मिळाली. याच मदतीतून २५ कुटूबियांचे टिनाचे शेड तयार करण्यात आली आहेत. गावातील गरजु आपातग्रस्तांना न्याय देण्यासाठी घरकुलाची यादी तयार करण्यात आली तर तलावाचा विकास कृती आराखडा करण्यात आलेला आहे. लघु पाटबंधारे स्थानिक स्तर यांनी २ कोटी ४० लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता तथा मुख्य अभियंता यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्ताव मंत्रालयात पोहचला आहे. परंतु निधी मंजुरीची माहिती सांगणारे कुणी नसल्याचे धक्कादायक वास्तवे पुढे आले आहे. गावकऱ्यांना हादरून सोडणाऱ्या तलावाचे जिर्णाेद्वार करण्यात अद्याप सुरूवात झाली नाही. यामुळे गावकरी पुन्हा भयभित झाली आहे. तलावाच्या विकास कामासाठी यंत्रणेला अल्प कार्यकाळ मिळणार आहे. यामुळे तलावाचे विकास कामे पूर्ण होणार किंवा नाही, अशी साशंकता गावकरी आणि शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. गावकऱ्यांची कागदी घोडे नाचविल्याने समस्या सुटणार नाही. दिसाहीन राजकीय आश्वासनाने गावकऱ्यांना आधार मिळणार नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी मुंबई, दिल्ली दरबार गाजविण्याची आवश्यकता आहे. बड्या राजकीय पुठाऱ्यांना या गावाची व्यथा माहित आहे. त्यांनी प्रत्यक्षात गावात पाणी केली आहे. यामुळे निधी खेचून आणण्याची जबाबदारी त्यांची आहे. (वार्ताहर)टिनशेडमध्ये सुविधांचा अभाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात २५ कुटुंबीयांचे टिनशेडमध्ये वास्तव्य आहे. बहुतांश वास्तव्य करणारे शेतकरी आहेत. शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाणी वाहून जाणारे नाली तथा शौचालयाचे बांधकाम नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाली आहे. स्वच्छतेचा शाळेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता हिच शाळा घाणीच्या विळख्यात सापडली असून विद्यार्थी वैतागली आहेत. या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे.