शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

ग्रामविकास समित्यांचे कार्य अधांतरी

By admin | Updated: October 25, 2014 01:03 IST

गावाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. मात्र फाईलबंद समित्या बाहेर निघाल्याच नाही.

लाखनी : गावाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. मात्र फाईलबंद समित्या बाहेर निघाल्याच नाही. याचा परिणाम ग्रामविकासावर जाणवू लागला आहे. यातून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या मदतीला गावातील सुजाण जनतेची सोबत असावी, म्हणून शासकीय स्थळावरून ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, सांडपाणी व्यवस्थापन पाणी वापर व वसुली योग्य व्हावी म्हणून पाणी पुरवठा स्वच्छता समिती वनसंरक्षण वनसंवर्धनासाठी वनव्यवस्थापन समिती गावातील तंटे गावातच मिळावेत म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जलसंवर्धन मुद्रासंवर्धन तसेच उपजिविकेचे संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी लेखाजोखा समिती, शैक्षणिक विकासासाठी शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे गठण केले जाते. मात्र समिती स्थापन करण्याची कागदोपत्री पूर्तता होताच समितीचे काम थांबते अनेकदा ग्रामसभेत समिती स्थापन करण्याची पूर्तता होताच समितीचे काम थांबते. तर बऱ्याच वेळा समिती स्थापन करण्यावरून ग्रामसभेत गावातील राजकीय वातावरण थांबते. समितीवर योग्य व्यक्तीची निवड व्हावी म्हणून ग्रामसभेचा प्रयत्न असतो. मात्र राजकीय लोकमंडळी आपल्या मर्जीतील वर्णी लावतात. त्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये निराशा दिसून येते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या सर्वांगीण विकासावर होतो.या सर्व समित्याचे कार्य कागदापलिकडे सरकत नसल्याने सर्व समित्याचे कामे झाली आहेत. समित्या स्थापन झाल्यानंतर कारवाई दिसत नाही. त्यांना प्रशासकीय स्तरावरून मार्गदर्शन व मदत होत नाही. कामकाजाचा आढावा सुद्धा घेतला नाही. त्यामुळे समित्या स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्य सातत्याने पुढे रेटले जाणे आवश्यक आहे. मात्र असे होत नाही. (तालुका प्रतिनिधी)