शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

ग्रामविकास समित्यांचे कार्य अधांतरी

By admin | Updated: October 25, 2014 01:03 IST

गावाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. मात्र फाईलबंद समित्या बाहेर निघाल्याच नाही.

लाखनी : गावाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर विविध समित्यांचे गठण करण्यात आले. मात्र फाईलबंद समित्या बाहेर निघाल्याच नाही. याचा परिणाम ग्रामविकासावर जाणवू लागला आहे. यातून शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या मदतीला गावातील सुजाण जनतेची सोबत असावी, म्हणून शासकीय स्थळावरून ग्रामविकास समितीची स्थापना करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, सांडपाणी व्यवस्थापन पाणी वापर व वसुली योग्य व्हावी म्हणून पाणी पुरवठा स्वच्छता समिती वनसंरक्षण वनसंवर्धनासाठी वनव्यवस्थापन समिती गावातील तंटे गावातच मिळावेत म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जलसंवर्धन मुद्रासंवर्धन तसेच उपजिविकेचे संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी लेखाजोखा समिती, शैक्षणिक विकासासाठी शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे गठण केले जाते. मात्र समिती स्थापन करण्याची कागदोपत्री पूर्तता होताच समितीचे काम थांबते अनेकदा ग्रामसभेत समिती स्थापन करण्याची पूर्तता होताच समितीचे काम थांबते. तर बऱ्याच वेळा समिती स्थापन करण्यावरून ग्रामसभेत गावातील राजकीय वातावरण थांबते. समितीवर योग्य व्यक्तीची निवड व्हावी म्हणून ग्रामसभेचा प्रयत्न असतो. मात्र राजकीय लोकमंडळी आपल्या मर्जीतील वर्णी लावतात. त्यामुळे सुजाण नागरिकांमध्ये निराशा दिसून येते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या सर्वांगीण विकासावर होतो.या सर्व समित्याचे कार्य कागदापलिकडे सरकत नसल्याने सर्व समित्याचे कामे झाली आहेत. समित्या स्थापन झाल्यानंतर कारवाई दिसत नाही. त्यांना प्रशासकीय स्तरावरून मार्गदर्शन व मदत होत नाही. कामकाजाचा आढावा सुद्धा घेतला नाही. त्यामुळे समित्या स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्य सातत्याने पुढे रेटले जाणे आवश्यक आहे. मात्र असे होत नाही. (तालुका प्रतिनिधी)