शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पाण्यासाठी महिलाचा मोर्चा धडकला पवनी पालिकेवर

By admin | Updated: May 20, 2016 00:43 IST

कमी पाणी पुरवठा, पाणी पुरवठा वेळेत बदल करावा आदी समस्येकरीता डॉ.आंबेडकर चौक व सोमवारी वॉर्डातील संतप्त महिलांनी नगरपरीषदेत धडक दिली.

पाणीटंचाई : समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारापवनी : कमी पाणी पुरवठा, पाणी पुरवठा वेळेत बदल करावा आदी समस्येकरीता डॉ.आंबेडकर चौक व सोमवारी वॉर्डातील संतप्त महिलांनी नगरपरीषदेत धडक दिली. या महिलांनी १५ दिवसात समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या वॉर्डात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग राहत आहे. त्यामुळे घरातील बहूतेक सर्व लोक दिवसभर कामावर जातात. या वॉर्डात नगरपालिका दुपारी २ ते २.३० वेळेत नळांना पाणी पुरवठा करते. दुपारच्या या तीव्र उन्हात मोठ्या संख्येतील कुटुंबांना या पाणी पुरवठ्याच्या वेळेमुळे पाण्यासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या वॉर्डांना इतर वॉर्डाच्या तुलनेत फारच कमी वेळ पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे येथील जनतला कमी पाणी मिळते. या वॉर्डात मोठ्या प्रमाणात टिल्लू पंप लावण्यात येत असल्यामुळे इतरांना पाणी कमी येते. तरीही नगर पालिकेकडून काहीही कार्यवाही करीत नाही.त्यामुळे या वार्डातील संतप्त महिलांनी नगर पालिकेमध्ये धडक देवून पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करून सकाळी किंवा सायंकाळी पाणी पुरवठा करावा. कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे पुरवठा वेळ वाढवून द्यावा आदी मागण्या या महिला करीता होत्या.याची सूचना कर्मचाऱ्यांनी नगर पालिका पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे न.प. उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर नगर पालिका सदस्य भाष्कर उरकुडकर, नगर पालिका पाणी पुरवठा प्रमुख हे नगर पालिका मध्ये दाखल होताच या संतप्त महिलांनी आपल्या समस्या सांगून मागण्यांचे निवेदन या पदाधिकाऱ्यांना देवून १५ दिवसात समस्या सुटली नाही तर आंदोलनाचा ईशारा दिला. याप्रसंगी डॉ.विजय ठक्कर यांनी १५ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी मिना बावनकर, मोनाली वानखेडे, उषा तलमले, वंदना दडवे, अर्चना दडवे, छाया करकाडे, निशा गणात्रा, कामीनी करकाडे, विशाखा गजभिये, रजनी करकाडे, जयश्री बोदेले, सुरेखा गजभिये, सरुबाई शेंडे, शिवकन्या रामटेके, उज्वला मोटघरे, छाया रामटेके, शशिकला शेंडे, वैशाली सुखदेवे, लिला दडवे, अर्चना सुर्यवंशी, मंगला जांभुळकर, वनीता बावनकर, अर्चना करकाडे, सुवर्णा भांबोरे, मंगला फुलबांधे, पुष्पा सुर्यवंशी, गिता करकाडे, सीमा मेश्राम, सिता मुळे, आशा करकाडे, मिरा उपरीकर, माया वासनीक, उषा नागोसे, देवका करकाडे, वानखेडे, भावना दडवे, शिल्पा करकाडे, शालू दडवे, मंजू करकाडे, मीना मुळे, शेंडे, संतोषी तलमले, आशा तलमले, नंदा मुंडले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)