शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कर्माशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य

By admin | Updated: April 20, 2016 01:01 IST

मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे.

निकेश भक्तमाली महाराजांचे प्रवचन : तुमसरात श्रीराम कथातुमसर : मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे. अर्थात बेईमानी करून कर्म केले व मला भगवंताची प्राप्ती झाली नाही असे होणार नाही. श्रेष्ठ कर्म करताना सत्यता व शुद्धता जीवनात अंगीकारावी लागेल तरच परमेश्वराची प्राप्ती होईल असे प्रवचन निकेश भक्तमाली महाराज यांनी केले.तुमसर येथे श्री हनुमान रामायण मंडळ द्वारा आयोजित श्रीराम कथेच्या प्रवचनात तृतीय पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. महाराज म्हणाले, प्रत्येक व्यक्ती जीवनात कर्म करताना प्रामाणिकतेला भर दिला पाहिजे. यात शिक्षक, डॉक्टर, कंत्राटदार, शासकीय अथवा खासगी कर्मचारीही कर्मप्रधान बनला पाहिजे. आपल्या निष्पाप कर्माने भगवंत प्रसन्न होतो. भारतीय संस्कृती विविधतेने नटली आहे. या संस्कृतीत चांगल्या चारित्र्याचा समावेश आहे. वेद, शास्त्र भारतीय संस्कृतीची आधारशिला असून पाश्चात्य संस्कृतीच्या गवगवामुळे आजची तरुण पिढी व्यसनात गुंतली आहे. त्यांना बाहेर काढायचे असेल तर वेद शास्त्रांसह चांगल्या संस्काराची रूजवण त्यांच्यामध्ये अंगीकारणे गरजेचे आहे. प्रभू रामचंद्रांनी वैदीक धर्माची स्थापना करून याच बाबीला प्राधान्य दिले होते. सदर प्रवचन २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या श्रीराम कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. यावेळी महावीर प्रसाद अग्रवाल, शिक्षक बघेल, हरिभाऊ अग्रवाल, सविता दुबे, कविता साखरवाडे, डॉ. प्रभाकर शेंडे, डॉ.गायधने, अनिलकुमार शेंडे यांच्यासह शेकडो भावीकगण उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)