शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

कर्माशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य

By admin | Updated: April 20, 2016 01:01 IST

मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे.

निकेश भक्तमाली महाराजांचे प्रवचन : तुमसरात श्रीराम कथातुमसर : मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. जीवनात कर्म केल्याशिवाय भगवंत प्राप्ती अशक्य आहे. अर्थात बेईमानी करून कर्म केले व मला भगवंताची प्राप्ती झाली नाही असे होणार नाही. श्रेष्ठ कर्म करताना सत्यता व शुद्धता जीवनात अंगीकारावी लागेल तरच परमेश्वराची प्राप्ती होईल असे प्रवचन निकेश भक्तमाली महाराज यांनी केले.तुमसर येथे श्री हनुमान रामायण मंडळ द्वारा आयोजित श्रीराम कथेच्या प्रवचनात तृतीय पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. महाराज म्हणाले, प्रत्येक व्यक्ती जीवनात कर्म करताना प्रामाणिकतेला भर दिला पाहिजे. यात शिक्षक, डॉक्टर, कंत्राटदार, शासकीय अथवा खासगी कर्मचारीही कर्मप्रधान बनला पाहिजे. आपल्या निष्पाप कर्माने भगवंत प्रसन्न होतो. भारतीय संस्कृती विविधतेने नटली आहे. या संस्कृतीत चांगल्या चारित्र्याचा समावेश आहे. वेद, शास्त्र भारतीय संस्कृतीची आधारशिला असून पाश्चात्य संस्कृतीच्या गवगवामुळे आजची तरुण पिढी व्यसनात गुंतली आहे. त्यांना बाहेर काढायचे असेल तर वेद शास्त्रांसह चांगल्या संस्काराची रूजवण त्यांच्यामध्ये अंगीकारणे गरजेचे आहे. प्रभू रामचंद्रांनी वैदीक धर्माची स्थापना करून याच बाबीला प्राधान्य दिले होते. सदर प्रवचन २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या श्रीराम कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात. यावेळी महावीर प्रसाद अग्रवाल, शिक्षक बघेल, हरिभाऊ अग्रवाल, सविता दुबे, कविता साखरवाडे, डॉ. प्रभाकर शेंडे, डॉ.गायधने, अनिलकुमार शेंडे यांच्यासह शेकडो भावीकगण उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)