शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 8, 2023 14:34 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांचा दिलासा

भंडारा : अलीकडे झालेल्या अवकाळी पावसाची आपणास कल्पना आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची देखील जाणीव आहे. त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण मुख्यमंत्री व सरकारसोबत चर्चा करून मदतीचा दिलासा देऊ, अशा शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्ह्यातील अवकाळी lग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल शुक्रवारी भंडारा येथे आले असता शहापूर येथील डिफेन्स सर्विसेस अकॅडमी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री परिणय फुके, पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्त, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपालांच्या भाषणापूर्वी खासदार सुनील मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्यातील अवकाळीने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून भरपाईची मागणी केली. तो धागा पकडून राज्यपाल म्हणाले, नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांची चर्चा झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास दिली आहे.

अवकाळीने झालेल्या नुकसानीबद्दल सर्वांनीच आपणाकडे चिंता व्यक्त केली आहे. त्याची दखल आपण घेतली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यपाल पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार जनतेसाठी योजना तयार करते. मात्र त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्या उपयोगाच्या ठरत नाही. २०४७ पर्यंत पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते आपणास पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कालबद्ध रीतीने अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र व राज्य सरकार जनतेला सशक्त करण्याचे काम करत आहे असे सांगून ते म्हणाले, जनतेचा सहभाग यात महत्त्वाचा असून त्यांना लाभ मिळाल्यानंतरच ही विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी होणार आहे. याप्रसंगी खासदार सुनील मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही आपल्या मनोगतातून विकासासंदर्भातील माहिती दिली. प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यात राबवलेल्या विविध योजनांची आणि जिल्ह्याच्या प्रगतीची आकडेवारीसह माहिती सादर केली. जिल्हा विकासाचे ध्येय निर्धारित करापुढील पाच वर्षात संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय निर्धारित करून त्यापर्यंत पोहोचा, असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. शिक्षण ही प्रगतीची आधारशिला आहे. त्यामुळे कौशल्य विकास हा उद्देश घेऊन ही यात्रा देशभर गावागावांमध्ये जात आहे. कारागीर आणि शिल्पकारांना वाव देऊन सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम या माध्यमातून केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपकार्यक्रमाच्या प्रारंभी विविध विभागातील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र व लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम स्थळी लावलेल्या स्टॉलची पाहणी करून राज्यपालांनी माहिती जाणून घेतली. चिखली येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :FarmerशेतकरीRamesh Baisरमेश बैसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार