शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यात वन्यजीव-मानवी संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : घनदाट जंगलाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात वन्यजीव मानवी संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला, तर वाघ, बिबटे, निलगाय, रानडुकरांच्या शिकारीच्या घटनाही पुढे आल्या. बहुतांश घटना जंगलात घडल्या असून, गावात शिरून कोणत्याही वन्यप्राण्याने अद्यापपर्यंत तरी हल्ला केला नाही. मात्र हल्ल्याची एखादी घटना घडली की वन्यजीवाला दोषी ठरवून त्यांच्याच बंदोबस्ताची मागणी केली जाते.भंडारा जिल्ह्यात ९३१.२४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. घनदाट जंगलात वाघ, बिबटे, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राणी आहेत. गत अनेक वर्षांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष होत आहे. परंतु अलीकडच्या काळात या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलामध्ये मानवाचा संचार वाढल्याचे दिसते. जिल्ह्यात कुठेही एखाद्या गावात वन्यप्राण्याने शिरून कुणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत. तीन महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला, तर रानडुकराच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.फेब्रुवारी महिन्यात लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथे सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार मारले होते, तर मंगळवार ५ एप्रिल रोजी इंदोरा जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या इसमाला वाघाने ठार केले. या दोन्ही घटना जंगलात घडल्या आहेत. वनविभाग वारंवार जनजागृती करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून परावृत्त करतात. मात्र अनेक जण जीव धोक्यात घालून जंगलात जातात. हल्ला झाला की वन्यप्राण्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते.

शिकारीच्या घटनात वाढ- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याच्या घटनांसोबतच वर्षभरात सहा वाघ, चार बिबटे आणि निलगाय, रानडुकराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी आता मानवानेच संयम बाळगून जंगलाला सुरक्षित ठेवण्यासाठी जंगलातील संचार कमी करणे गरजेचे आहे. वनविभागाच्यावतीने जनजागृती केली जात असली तरी नागरिकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. मोहफूल संकलन करण्यासाठी अनेक जण जंगलात जातात. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही. त्यामुळे हल्ल्याच्या घटना वाढत आहे.

मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सभा घेतल्या जातात. एखादी घटना घडली तर परिसरातील गावात दवंडी देऊन जंगलात न जाण्याची सूचना केली जाते. - राहुल गवई, उपवनसंरक्षक भंडारा 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforestजंगल