शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक पाणवठ्यावरच वन्यप्राणी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगेत तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रचा समावेश असून, कृत्रिम पाणवठ्याअभावी वन्यप्राण्यांना नैसर्गिक पाणवठ्यावरच तहान भागवावी लागत आहे. तापत्या उन्हाने नैसर्गिक पाणवठेही तळाला जात असून, वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातून बावनथडीचा मुख्य कालवा असून, पाण्याच्या शोधात कालव्यात उतरून वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसत आहेत. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा विक्रम होत आहे.  वन्यप्राण्यांचा जीव पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर परिसरात आहे. सध्या मोजक्या तलावात पाणी उपलब्ध आहे. इतर लहान-मोठे तलाव आटलेले आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात चांदपूर तलाव, पांगडी तलाव व बावनथडी धरण व बावनथडी मुख्य कालवा, बघेडा तलाव आदी मोठे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यासाठी वन्यप्राण्यांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. बावनथडीच्या मुख्य कालव्यात पाणी पिण्यासाठी वन्यजीव उतरतात. मात्र, त्यांना पुन्हा वर चढणे कठीण होते. अनेकदा प्राणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. कधीकधी त्यांचा प्राणही जातो.वन विभागाने किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये विविध कामांवर खर्च करतो; परंतु वन्यप्राण्यांसाठी निधी खर्च होताना दिसत नाही. 

मध्यप्रदेशातील शिकारी नजर ठेवून

- महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

तुमसर वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाहीत. तशीही या वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्याची गरज नाही. -गोविंद लुचे, वन परिक्षेत्र अधिकारी, तुमसर

 

टॅग्स :water shortageपाणीकपातwildlifeवन्यजीव