शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

नैसर्गिक पाणवठ्यावरच वन्यप्राणी भागवताहेत तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगेत तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रचा समावेश असून, कृत्रिम पाणवठ्याअभावी वन्यप्राण्यांना नैसर्गिक पाणवठ्यावरच तहान भागवावी लागत आहे. तापत्या उन्हाने नैसर्गिक पाणवठेही तळाला जात असून, वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातून बावनथडीचा मुख्य कालवा असून, पाण्याच्या शोधात कालव्यात उतरून वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसत आहेत. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा विक्रम होत आहे.  वन्यप्राण्यांचा जीव पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर परिसरात आहे. सध्या मोजक्या तलावात पाणी उपलब्ध आहे. इतर लहान-मोठे तलाव आटलेले आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात चांदपूर तलाव, पांगडी तलाव व बावनथडी धरण व बावनथडी मुख्य कालवा, बघेडा तलाव आदी मोठे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यासाठी वन्यप्राण्यांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. बावनथडीच्या मुख्य कालव्यात पाणी पिण्यासाठी वन्यजीव उतरतात. मात्र, त्यांना पुन्हा वर चढणे कठीण होते. अनेकदा प्राणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. कधीकधी त्यांचा प्राणही जातो.वन विभागाने किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये विविध कामांवर खर्च करतो; परंतु वन्यप्राण्यांसाठी निधी खर्च होताना दिसत नाही. 

मध्यप्रदेशातील शिकारी नजर ठेवून

- महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. 

तुमसर वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाहीत. तशीही या वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्याची गरज नाही. -गोविंद लुचे, वन परिक्षेत्र अधिकारी, तुमसर

 

टॅग्स :water shortageपाणीकपातwildlifeवन्यजीव