शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मोठ्यांपेक्षा लहान मुलांना अधिक राग का येतो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:51 IST

Bhandara : तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांवर रागावू नये, प्रेमाने सांगावे !

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अलीकडे जेवढा मोठा राग मोठ्या व्यक्तीला येतो, त्याच्या दुपटीने लहान मुलांना येत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांशी जवळीक साधून त्यांच्याशी प्रेमाने बोलत, कुरवाळत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन राग शांत करावा, प्रेमाने बोलले नाही तर मुलांच्या मनात राग कायम राहतो. त्यामुळे कधीही लहान मुलांना रागावू नये, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे. आधुनिक जीवन पद्धती लोप पावल्याने त्याचे वितरित परिणाम जाणवत आहेत.

मुलांमध्ये राग वाढण्याची कारणे काय? मोबाइलचा अतिवापर : लहान मूल रडू लागले की, अनेक पालक मुलाच्या हातात हल्ली मोबाइल देतात. यानंतर हा मोबाइल मागितला की मुले रागराग करतात. अशावेळी पालकांनी मोबाइल व इतर वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत. मुलांना मैदानात खेळण्यासाठी पुरेशी मोकळीक द्यावी. संयुक्त कुटुंबपद्धतीचा अभाव : नोकरीनिमित्ताने आज अनेक ठिकाणी एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली आहे. पती-पत्नी नोकरीला जात असून, लहान मुलांना पाळणाघरात ठेवत आहेत. अशावेळी लहान मुलांची चिडचिड होते व त्यांचा राग वाढणे स्वाभाविकच असते. त्यामुळे लहान मुलांशी प्रेमाने बोलत राहावे.

पालक काय म्हणतात"अलीकडे लहान मुलांना थोडे जरी बोलले तरी राग येतो. रागाच्या भरात दोन-दोन तास अबोला धरत आहेत. अशावेळी लहान मुलांची खूप समजूत काढावी लागते. प्रेमाने चांगले-वाईटाची समजूत द्यावी." - सुरेंद्र मदनकर, भंडारा

"लहान मुले नेहमीच मोबाइलचा हट्ट करीत असतात. मोबाइल दिला नाही की, चिडचिड करतात. मोबाइलसारख्या वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत, दिल्या तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. त्यांच्या मनातील भावना समजून घ्याव्या." - संजय बोंदरे, मुंडरी.

इतरांचा राग मुलांवर काढू नये..."कोणत्याही गोष्टीवरून रागराग करणे हे योग्य नव्हे. आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही की, अनेकजण रागराग करतात. राग आला की, घोटभर पाणी प्यावे व लहान मुलांना प्रेमाने समजावून सांगावे." - डॉ. सहास गजभिये, मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा

"पालकांनी इतर गोष्टीचा राग लहान मुलांवर काढणे योग्य नाही. लहान मुले ही कोवळ्या मनाची असतात. अशावेळी मुलांना प्रेमाने बोलून त्यांची समजूत काढल्यास मुलांचा रांग शांत होतो." - डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलbhandara-acभंडारा