शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

नगर परिषद हद्दीतील बेवारस वाहनांचे मालक आहेत तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

भंडारा : शहरात गत काही वर्षांपासून अनेक रस्त्यांवर तसेच काही रिकाम्या जागांवर वाहने बेवारस स्थितीत उभी आहेत, मात्र ...

भंडारा : शहरात गत काही वर्षांपासून अनेक रस्त्यांवर तसेच काही रिकाम्या जागांवर वाहने बेवारस स्थितीत उभी आहेत, मात्र याबाबत कोणीच तक्रार करत नसल्याने या वाहनांचे मालक नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंडारा शहरातील अण्णा भाऊ साठे चौक ते शीतला माता मंदिर मार्गावर, तुकडोजी वाॅर्डातील रिकाम्या जागेवर तसेच शहरातील अन्य काही भागात ही बेवारस वाहने दिसून येत असल्याने वाहतुकीला धोकादायक ठरू शकतात. मात्र असे असतानाही नागरिकांकडून कोणतीच तक्रार केली जात नसल्याचे वास्तव आहे. वाहतूक पोलिसांनाही अशा वाहनांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत.

त्यामुळे भंडारा नगर परिषदेने अशा बेवारस वाहनांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची गरज आहे. भंडारा नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसात अशा बेवारस वाहनांची शोधमोहीम राबवली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भंगार वाहने शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. २४ तासांपेक्षा जास्त वेळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना नगर परिषद भंडारामार्फत नोटिसा देण्याची गरज आहे. अशी वाहने तत्काळ न हटविल्यास तत्काळ दंड आकारून कारवाई करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून एकाच जागेवर उभी असणारी अशी बेवारस वाहने भंडारेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बॉक्स

बेवारस वाहनांमुळे अस्वच्छतेचा प्रश्न

भंडारा शहरातील काही रस्त्यांच्या कडेला अशी बेवारस वाहने दिसून येतात. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वाहने अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे येथे अस्वच्छता पसरत असून, परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली घाण वाढत असून ही वाहने अपघाताला आमंत्रण देतात. यासोबतच येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बॉक्स

अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात

भंडारा शहरातील तुकडोजी वाॅर्डात खुल्या जागेत अनेक वर्षांपासून एक वाहन बेवारस स्थितीत धूळ खात पडलेले आहे. मात्र याबाबत हे वाहन कोणाचे आहे, कधीपासून आहे याबाबत कल्पना नाही. त्यामुळे एकाच जागेवर पडून असणाऱ्या अशा वाहनांचा प्रश्न शहरात गंभीर रूप धारण करत आहे. यासाठी नगर परिषदेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे.

कोट

भंडारा शहरात काही रस्त्यांवर, घरासमोर वाहने लावलेली असतात. त्यामुळे विनाकारण जागा अडवली जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरताे. शिवाय वाहने काढण्यास सांगितले असता अनेकदा वाद होतात. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.

विवेक मेश्राम, तरुण भंडारा

बेवारस वाहने नगर परिषदेने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. शहरातील बहुतांश भागात अनेक गाडीमालक आपली वाहने रस्त्यावर सोडून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर बनतो.

संजय आकरे, शिवसेना पदाधिकारी, भंडारा

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अनेकदा वाहतूक कोंडी होते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण होते. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते नगर परिषदेने याविरोधात मोहीम राबविण्याची गरज आहे.

राजेंद्र खेडीकर, सामाजिक कार्यकर्ता, भंडारा