शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

साहेब तुम्हीच सांगा, शेती रासायनिक करू की सेंद्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 15:12 IST

खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर : शेती व्यवसाय तोट्याचाच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : व्यवसायातून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करणे महागडे ठरत आहे. परिणामी शेती व्यवसायात तोटाच सहन करावा लागतो. रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत आणि सेंद्रिय खत वापरले तर त्याचा एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत शेतमालाच्या आधारभूत किमती मात्र फारच कमी आहे. त्यामुळे या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. रासायनिक खतांचा व तणनाशक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जमिनीचा स्तर घसरला आहे. तसेच यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही, पाण्याचा निचराही होत नसल्याने उत्पादनात घट येत आहे. शेती पुरेपूर रासायनिक खतांच्या वापराची झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खते त्वरित कार्य करणे शक्य नाही, यासाठी भरपूर अवधी लागेल, यासाठी काही प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल.

सेंद्रिय खतांचाही तुटवडा■ जिल्ह्यातील बरेच शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करून शेती व्यवसाय करण्यावर भर देत आहेत, पण सेंद्रिय खत स्वतः अंगमेहनत करून तयार करावे लागते, पण असे मात्र खूप कमी शेतकरी करतात, यामुळे सेंद्रिय खतांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीच कामाची ठरते.

सेंद्रिय शेतीतून भागणार कसे?■ आता शेती पूर्णतः रासायनिक खतांनी माखली आहे. या खतांच्या वापरामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे; पण आता सेंद्रिय खतांचा वापर केल्यास तुलनेत उत्पादनात कमालीची घट येईल, आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्पादन फार कमी होईल.

सेंद्रिय खते तरी स्वस्त कुठे?■ रासायनिक खते कृषी केंद्रातून सहज उपलब्ध होतात; पण सेंद्रिय खत मात्र तयार करावे लागतात, जर सेंद्रिय खत विकत घ्यायचे असल्यास यासाठी अधिक रक्कम मोजावी लागते, सध्या महिला बचत गटांकडून सेंद्रिय खत तयार केले जाते. 

टॅग्स :bhandara-acभंडाराOrganic Farmingसेंद्रिय शेतीfarmingशेती