शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

६० वर्षापुर्वीचे जन्माचे दाखले कुठून आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंती करत आहे. गावाच्या बाहेर पालावर राहून आजही अनेक परिवार जगून राहिले आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे बाता शासन करते व कागदपत्रांच्या जाचक अटी समोर ठेवते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या-विमुक्त समाजाला मिळावे, असे निर्देश असले तरी कागदपत्रातील त्रुटी त्यांच्यासाठी मारक ठरत आहेत. भटके-विमुक्त ६० वर्षापूर्वीचे जन्माचे दाखले कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विशेष कॅम्प लावण्याची मागणी एकलव्य सेना, वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये १५ हजारांच्या वर अर्ज भरण्यात आले. पंचायत समिती व खंडविकास अधिकारी यांनी काही अर्ज न तपासताच समाजकल्याण विभागाकडे पाठविले. जेव्हा समाजकल्याण विभागमध्ये एवढे अर्ज आले त्या अर्जाची छाननी करताना विभागाची दमछाक झाली. छाननीमध्ये अनेक अर्जामध्ये कागदपत्रांची कमतरता होती. ज्यामध्ये जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अल्पभूधारक असण्याचे प्रमाणपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखलासाठी ५० ते ६० वर्षांपूर्वीचे जन्माचे दाखले लागतात. जातीच्या नोंदी मागण्यात येतात. हा समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर सुद्धा भटकंती करत आहे. गावाच्या बाहेर पालावर राहून आजही अनेक परिवार जगून राहिले आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे बाता शासन करते व कागदपत्रांच्या जाचक अटी समोर ठेवते. याने  शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते.  यासंदर्भात एकलव्य सेना, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने दाखवली. शिष्टमंडळात एकलव्य सेनेचे मार्गदर्शक व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सुरेश खंगार, अंकित तांदूळकर, विकेश तांदूळकर, राजू तांदुळकर, राजेश तिवस्कर, मिथुन सुतार, इंदिराबाई तिवस्कर   उपस्थित होते.ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ भटक्या विमुक्तांना मिळावे यासाठी गत दोन वर्षांपासून एकलव्य सेना व वंचितच्यावतीने लढा सुरू आहे. या लढ्याला यश मिळाले असले तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अडेलतट्टु धोरणाने अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित होत असल्याचे दिसते.

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रgovernment schemeसरकारी योजना