शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विरलीतील पाणी समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:48 IST

मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्दे६६ लाखांची योजना कुचकामी : पाणी पुरवठा योजनेचे ग्रहण सुटता सुटेना

हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.सुमारे ३००० लोकवस्तीच्या या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपये खर्च करून वाढीव पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. यासाठी गावात पाच सार्वजनिक नळकोंडाळे आणि सुमारे ४५० खासगी नळजोडण्या कार्यरत आहेत. मात्र या पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंपधारकांना मिळत असलेले अभय आणि पाणी पुरवठा योजनेत वारंवार येत असलेल्या बिघाडांमुळे गावकºयांना गेल्या अडीच महिन्यांपासून दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणी पुरवठा केला जातो. परिणामी गावकºयांवर भर उन्हातान्हात गावाशेजारील शेतामधून बैलबंडी, ट्रॅक्टर, सायकल आदी साधनांनी पाणी आणण्याची पाळी आली आहे.गावात १५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. या हातपंपावरही रात्री बेरात्री पाणी भरणाºया महिलांची गर्दी आढळून येत असून पाण्यासाठी महिलांची आपआपसात भांडणे होत आहेत. या पाणी समस्येमुळे काही कुटुंबावर आपल्या बायको मुलांसह पाणी भरण्याची पाळी आली आहे. गावातील पाणी समस्येने एवढे गंभीर स्वरुप धारण केले असताना स्थानिक प्रशासनाला या पाणी पुरवठा योजनेतील बिघाड कायम स्वरुपी दूर करण्यात अपयश येत आहे.गावात सुमारे शंभरावर टिल्लूपंप धारक असून त्यात काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश आहे. या टिल्लूपंप धारकांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक प्रशासन या टिल्लू पंपधारकांना पाठीशी घालत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. नळधारकांना पाणी मिळत नसल्यामुळे ते आपल्या नळ कनेक्शनजवळ खड्डा खोदून विना परवानगीने मुख्य पाईपलाईनवर सोयीस्कर ठिकाणी नळजोडणी करून पाणी मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत. या नळधारकांवर ग्रामप्रशासनाचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे.सध्या या पाणी पुरवठा योजनेला अनेक समस्यांनी ग्रासले असून कधी मोटारची वायरिंग जळते, कधी व्हॉल्व निकामी होणे या सारख्या समस्या नित्याच्याच झालेल्या आहेत. सध्या गावात रोजगार हमीची कामे सुरु असून शेतकºयांची खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची शेतीकामे सुरु आहेत. अशा या कामांच्या धावपळीत वेळी अवेळी होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडत आहे.जलवर्षातच जलसंकटाची नामुष्कीविरली बु. ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभिमान, मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्रामप्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकऱ्यांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुष्की ओढवली.