शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनावर आधारित भाव मिळणार कधी?

By admin | Updated: November 22, 2015 00:30 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत.

गरज आधाराची : धान उत्पादक शेतकऱ्यांची चहुबाजूने कोंडीभंडारा : शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर अन्यायच केला जातो. शेतमालाला देण्यात येणारा भाव शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावामध्ये शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबल्याची भावना आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यामध्ये मुख्यत्वे धानाचे पीक घेतले जाते. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून या परिसरातील शेतकरी विविध प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या धानपिकांचे उत्पन्न घेत असतात. परंतु धान उत्पादक शेतकरी प्रगतीऐवजी अधोगतीकडेच जात असल्याचे चित्र आहे.शेतकरी खरीप हंगामात जवळपास पाच ते सहा महिने कुटुंबासोबत राबत असतो. रब्बी हंगामातही राबून शेती कसत असतो. मात्र त्याला हव्या त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. शेतकरी कर्जाच्या ओज्याखाली दबला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंगणीक वाढ होत आहे.यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या परिसरामध्ये सिंचनाच्या सोयी नाहीत. बी-बियाणे, खत मजुरी, कीटकनाशके, औषधी यांचे भाव गगणाला भिडले आहे. धानाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येऊन शेतकरी तोट्यात शेती व्यवसाय करीत आहे. उत्पन्न कमी झाले तरी कर्ज काढून शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन होण्याच्या आशेने शेती करतो. परंतु निसगार्चा लहरीपणा आणि धान पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीककर्ज भरण्याचे संकट निर्माण झाले आहे. उत्पादन झाले नसल्याने बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. त्यामुळे मृत्यूला कवटाळण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही, अशी स्पष्ट चिंता बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसते. देशाचा कणा समजला जाणाऱ्या जगाच्या पोशींद्याचे कर्ज माफ करावे तेव्हाच तो ताठ मानेने उभा राहील, असे मत शेतकऱ्यांचे आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरजपालांदूर : विदर्भातील चार जिल्ह्यातील धानाचा शेतकरी शासन प्रशासनाच्या तुघलकी धोरणाने कमाल अडचणीत आला आहे. निसर्गाचा भार सहता सहता धान पिकवायचे आणि विकायला गेले तर बारा भानगडी उभ्या राहायच्या. यामुळे धान उत्पादक लोकप्रतिनिधीवर कमालीचा नाराज झाला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात हलक्या व जाड धानाची मळणी हंगाम व विक्री हंगाम जोमात आला आहे. शासनाने १ नोव्हेंबरपासून हमी केंद्र सुरु करण्याचा आदेश दिला. प्रशासनाकडून अंमलबजावणी करू न शकल्याने शेतकऱ्यांनी अर्धाअधिक माल खासगीत १२०० रुपयात विकला. आजचे लोकप्रतिनिधी धानाचे उत्पादक आहेत. समस्यांशी निगडीत आहे. परंतु सकारात्मक निर्णय घेत धान उत्पादकांना यथोचित न्याय देण्यात मागे पडत असल्याने शेतकरी संकटात असून त्याला सावरण्याची गरज आहे. पुढच्या महिन्यात धान पट्ट्याच्या जवळ उपराजधानीत दिवाळी आयोजन नियोजित आहे. जिल्ह्यातील आमदारांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची का गरज आहे, हे शासनाला पटवून देत प्रतिक्विंटल ३०० रुपयाच्या वर बोनसमिळवून देण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे अशी आग्रही मागणी धान उत्पादकांची आहे. मातीतला धान सन्मानाने जगात विकला पाहिजे. हे शक्य आहे. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.