शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत केव्हा सामावून घेणार?

By admin | Updated: December 10, 2015 00:54 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे.

जिल्ह्यात १२ हजार कर्मचारी : शासनाने आता तरी न्याय द्यावावरठी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे. राज्यातील ७,५०० कर्मचाऱ्यांनी गतवर्षी ४५ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार शासनस्तरावर बैठका घेण्यात आले होते. वर्ष लोटूनही अंशकालीन कर्मचारी भरतीचा प्रश्न कायम आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.१९९० च्या दशकात राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कार्यालयात पदवीधर असलेल्या युवक - युवतीना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राज्यातील ७,५०० पदवीधराना काम मिळाले होते. यात भंडारा जिल्ह्यातील एक हजार पदवीधर होते. सलग तीन वर्ष या कर्मचाऱ्यानी संबंधित कार्यालयात ३०० रूपये मानधनावर सेवा दिली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. यामुळे शेकडो अंशकालीन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अंशकालीन र्कमचारी म्हणून कामावर असल्यामुळे त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ७,५०० युवक बेरोजगार झाले.पदविधर अंशकालिन कर्मचाऱ्याच्या समस्यासंदर्भात १७ वर्षांपासून संघटनेकडून लढा सुरू आहे. गतवर्षी शासनाने त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते. उमेदीच्या काळात अचानक कामावरून कमी केले. कामावर घेण्यासाठी आंदोलनात १७ वर्षे उलटली. यामुळे शासकीय नोकरी वयोमर्यादा ओलांडण्यात आली. हाताला मिळेल ते काम आणि कुंटुबाचा गाडा ओढण्यात वय निघून गेल्यामुळे शासनाने अंशकालीन कर्मचाऱ्याना नियुक्त करण्याची मागणी संघटनेनी केली आहे. या संदर्भात शासनस्तरावर नियोजन आणि इतर योजना पुर्ण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन नोकरी देण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ बांगरे, रवींद्र लाजेंवार, योगेश मलेवार, शंकर हेमणे, विष्णु देशमुख, सरीता घोल्लर, सुरेखा डोंगरे, राजेश शहारे, दिलीप कळंबे, माधुरी बोंदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)