शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत केव्हा सामावून घेणार?

By admin | Updated: December 10, 2015 00:54 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे.

जिल्ह्यात १२ हजार कर्मचारी : शासनाने आता तरी न्याय द्यावावरठी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे. राज्यातील ७,५०० कर्मचाऱ्यांनी गतवर्षी ४५ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार शासनस्तरावर बैठका घेण्यात आले होते. वर्ष लोटूनही अंशकालीन कर्मचारी भरतीचा प्रश्न कायम आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.१९९० च्या दशकात राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कार्यालयात पदवीधर असलेल्या युवक - युवतीना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राज्यातील ७,५०० पदवीधराना काम मिळाले होते. यात भंडारा जिल्ह्यातील एक हजार पदवीधर होते. सलग तीन वर्ष या कर्मचाऱ्यानी संबंधित कार्यालयात ३०० रूपये मानधनावर सेवा दिली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. यामुळे शेकडो अंशकालीन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अंशकालीन र्कमचारी म्हणून कामावर असल्यामुळे त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ७,५०० युवक बेरोजगार झाले.पदविधर अंशकालिन कर्मचाऱ्याच्या समस्यासंदर्भात १७ वर्षांपासून संघटनेकडून लढा सुरू आहे. गतवर्षी शासनाने त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते. उमेदीच्या काळात अचानक कामावरून कमी केले. कामावर घेण्यासाठी आंदोलनात १७ वर्षे उलटली. यामुळे शासकीय नोकरी वयोमर्यादा ओलांडण्यात आली. हाताला मिळेल ते काम आणि कुंटुबाचा गाडा ओढण्यात वय निघून गेल्यामुळे शासनाने अंशकालीन कर्मचाऱ्याना नियुक्त करण्याची मागणी संघटनेनी केली आहे. या संदर्भात शासनस्तरावर नियोजन आणि इतर योजना पुर्ण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन नोकरी देण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ बांगरे, रवींद्र लाजेंवार, योगेश मलेवार, शंकर हेमणे, विष्णु देशमुख, सरीता घोल्लर, सुरेखा डोंगरे, राजेश शहारे, दिलीप कळंबे, माधुरी बोंदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)