शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत केव्हा सामावून घेणार?

By admin | Updated: December 10, 2015 00:54 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे.

जिल्ह्यात १२ हजार कर्मचारी : शासनाने आता तरी न्याय द्यावावरठी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी १७ वर्षापासून लढा सुरू आहे. राज्यातील ७,५०० कर्मचाऱ्यांनी गतवर्षी ४५ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी अंशकालीन कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार शासनस्तरावर बैठका घेण्यात आले होते. वर्ष लोटूनही अंशकालीन कर्मचारी भरतीचा प्रश्न कायम आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची मागणी अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.१९९० च्या दशकात राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कार्यालयात पदवीधर असलेल्या युवक - युवतीना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. राज्यातील ७,५०० पदवीधराना काम मिळाले होते. यात भंडारा जिल्ह्यातील एक हजार पदवीधर होते. सलग तीन वर्ष या कर्मचाऱ्यानी संबंधित कार्यालयात ३०० रूपये मानधनावर सेवा दिली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. यामुळे शेकडो अंशकालीन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अंशकालीन र्कमचारी म्हणून कामावर असल्यामुळे त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ७,५०० युवक बेरोजगार झाले.पदविधर अंशकालिन कर्मचाऱ्याच्या समस्यासंदर्भात १७ वर्षांपासून संघटनेकडून लढा सुरू आहे. गतवर्षी शासनाने त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आश्वासन दिले होते. उमेदीच्या काळात अचानक कामावरून कमी केले. कामावर घेण्यासाठी आंदोलनात १७ वर्षे उलटली. यामुळे शासकीय नोकरी वयोमर्यादा ओलांडण्यात आली. हाताला मिळेल ते काम आणि कुंटुबाचा गाडा ओढण्यात वय निघून गेल्यामुळे शासनाने अंशकालीन कर्मचाऱ्याना नियुक्त करण्याची मागणी संघटनेनी केली आहे. या संदर्भात शासनस्तरावर नियोजन आणि इतर योजना पुर्ण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन नोकरी देण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ बांगरे, रवींद्र लाजेंवार, योगेश मलेवार, शंकर हेमणे, विष्णु देशमुख, सरीता घोल्लर, सुरेखा डोंगरे, राजेश शहारे, दिलीप कळंबे, माधुरी बोंदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)