शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गरजूंना हक्काचे घर केव्हा मिळणार?

By admin | Updated: February 11, 2016 00:49 IST

नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शेकडो बेघर कुटुंब वास्तव्यास आहेत. काहींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून स्वत:च्या कुटुंबासाठी निवारा उपलब्ध करून दिलेला आहे.

पवनी येथील प्रकार : नगरपालिका क्षेत्रातील तक्रारअशोक पारधी पवनीनगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शेकडो बेघर कुटुंब वास्तव्यास आहेत. काहींनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून स्वत:च्या कुटुंबासाठी निवारा उपलब्ध करून दिलेला आहे. शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत ७६ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आलेले होते. त्यापैकी चार लाभार्थ्यांनी मालकीच्या जागेवर घरकूल बांधले आहे. उर्वरीत ७२ घरकुलांचे काम पालिका प्रशासनाने ठेकेदारी पद्धतीने संयुक्त घरकुल पद्धती वापरून करण्याचे ठरविले. परंतु दोन वर्ष लोटूनही घरकुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घर केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत भाईतलाव वॉर्डातील एका इमारतीत १२, रामपूरी वॉर्डात १२, वैजेश्वर वॉर्डात क्र. १ च्या इमारतीमध्ये १२ क्रमांक २ इमारतीमध्ये १२ असे एकूण ४ इमारतीमध्ये ४८ घरकुल बांधण्यात आले आहे. त्यापैकी ४२ घरकुलाचे काम पूर्ण तर ६ घरकुलाचे काम अपूर्ण आहे. लाभार्थ्यांनी भरावयाची रक्कम भरल्यानंतर घरकुल दिले जात आहे. परंतु इमारतीचे काम पूर्ण करावयास लागणारा कालावधी खूप जास्त असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वैजेश्वर वॉर्डातील क्रमांक दोनच्या इमारतीचे काम प्रलंबित असल्याने लाभार्थी हिस्सा भरूनही त्यांना घरकुल उपलब्ध होऊ शकलेला नाही.