शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

अड्याळला प्रवासी निवारा मिळणार केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:00 IST

भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची दमछाक : समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे.गत अनेक वर्षापासून या प्रवासी निवाऱ्याची मजबुत भिंत आणि छत मात्र बनू शकले नाही. यासाठी पुढाकार धेण्याची गरज आहे. शाळेचे सत्र सुरू झाले असून रोज अड्याळला हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. परंतु जेव्हा केव्हा विद्यार्थी तथा प्रवासी या प्रवासी निवाºयात उन वारा पावसाळ्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा मात्र भंग पावताना दिसते.प्रवासी निवारा येथेच व्हावा अशी कल्पना तथा चर्चा गावात असली तरी त्यासाठी येथील ग्रामपंचायत, नेते मंडळी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. परंतु आजपर्यंत यापैकी कुणाच्याही हाताला यश आले नाही. मागील वर्षात जेव्हा नवनियुक्त सरपंच व सदस्यांनी याच प्रवासी निवाºयाकडे लक्ष देवून काम केले होते तेव्हा ग्रामस्थांनाही विश्वास होता की आतातरी पक्का प्रवासी निवारा होणार परंतु आजही चार खांबावर ताडपत्रीच्या मांडवात प्रवाशांना ऊन, वारा, पावसात जीव धोक्यात ठेवून उभे राहावे लागते.बस थांबा परिसरात विद्यार्थी तथा प्रवाशांची एवढी गैरसोय होत असतानाही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेवून गप्प बसणारे आतातरी जागे होणार काय, लोकप्रतिनिधी तथा ग्रामपंचायत प्रशासन यावर तात्काळ कोणती दखल घेणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. दिवस उन्हाचे असोत वा पावसाचे किंवा सोसाट्याचा वारा यापासून स्वत:चे बचाव व्हावे यासाठी येथील प्रत्येक प्रवाशांची धडपड नेहमीच पाहायला मिळत असते.प्रवासी निवारा तयार होवू शकत नाही काय, ग्रामपंचायत प्रशासनाने एका निवेदनाद्वारे प्रवासी निवारा यासाठी जागा व बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिल्याची माहिती आहे.भकास झालेल्या प्रवाशी निवाºयाचा विकास शेवटी लोकप्रतिनिधीच्या निधीतून की लोकवर्गणीतून होणार हे वेळच ठरवणार असली तरी तात्काळतेने या प्रश्नाला सोडविणे आवश्यक झाले आहे. यासाठी पाठपुरावा नियमीतपणे होणे हेही तितकेच सत्य आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी