शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:44 IST

मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.

ठळक मुद्देजीवघेणे धाडस : भंडारा जिल्ह्यातील सोनी-आवळी नदी पात्रातील प्रकार

जितेंद्र ढोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी-आवळी दरम्यान चुलबंद नदी दुथडी भरून वाहात आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सोनी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी आवळी शेतशिवारात तर आवळी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी इंदोरा येथील शेतशिवारात असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे केली जातात. आवळी या गावाला बेटाचे स्वरूप आले असून, या गावाला चहुबाजूंनी चुलबंद व वैनगंगा नदीने वेढले आहे. येथील गावकरी व शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन कामासाठी डोंग्यातून प्रवास करून नदी पार करावी लागत असते.मागील ५० वर्षांपासून या नदीपात्रातून पुलाच्या कामाची मागणी केली जात असून शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कित्येकदा या नदी पात्रातुन पुलाचे काम करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. आवळी येथील गावकरी नेहमीच डोंग्यातून जीवघेणा प्रवास करून आपल्या दैनंदिन गरजा भागवित असतात. सोनी येथील शेतकºयांच्या ३२८ हेक्टर जमिन आवळी शेतशिवारात असून पावसाळी धान रोवणीची कामे जोमाने सुरू असल्याने चिखल करण्यासाठी सोनीवरून आवळीला ट्रॅक्टर नेण्यात आले होते.दरम्यान, गुरूवारला दिवसभरातून नदीपात्रात पाणी वाढल्यामुळे ट्रॅक्टर आवळीमध्येच ठेवण्यात आले होते. सहा दिवस होऊनही नदी पात्रातील पाणी कमी न झाल्यामुळे पलीकडील शेतीची कामे करण्यासाठी गावातील काही धाडसी तरूणांनी रॉकेलचे रिकामे ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडून बाहेर काढण्याचे ठरविले. आणि गुरूवारला सकाळी गावातील रॉकेल दुकानातील रिकामे २१ ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडले आणि एक-एक करून सहाही ट्रॅक्टर बाहेर काढले. तरूणांनी घेतलेला हा निर्णय जिवघेणा आणि तितकाच धाडसी असल्यामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूला गावकºयांनी हा प्रकार बघण्यासाठी गर्दी केली होती.या घटनेची माहिती होताच नायब तहसिलदार विजय कावळे, तलाठी कौरवार, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. धाडसामुळे हे ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले असले तरी हा जीवघेणा प्रवास आमच्या पाचवीला पूजलेला राहणार का? असा संतप्त सवाल सोनी-आवळी येथील ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :floodपूरriverनदी