शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:44 IST

मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.

ठळक मुद्देजीवघेणे धाडस : भंडारा जिल्ह्यातील सोनी-आवळी नदी पात्रातील प्रकार

जितेंद्र ढोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी-आवळी दरम्यान चुलबंद नदी दुथडी भरून वाहात आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सोनी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी आवळी शेतशिवारात तर आवळी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी इंदोरा येथील शेतशिवारात असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे केली जातात. आवळी या गावाला बेटाचे स्वरूप आले असून, या गावाला चहुबाजूंनी चुलबंद व वैनगंगा नदीने वेढले आहे. येथील गावकरी व शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन कामासाठी डोंग्यातून प्रवास करून नदी पार करावी लागत असते.मागील ५० वर्षांपासून या नदीपात्रातून पुलाच्या कामाची मागणी केली जात असून शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कित्येकदा या नदी पात्रातुन पुलाचे काम करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. आवळी येथील गावकरी नेहमीच डोंग्यातून जीवघेणा प्रवास करून आपल्या दैनंदिन गरजा भागवित असतात. सोनी येथील शेतकºयांच्या ३२८ हेक्टर जमिन आवळी शेतशिवारात असून पावसाळी धान रोवणीची कामे जोमाने सुरू असल्याने चिखल करण्यासाठी सोनीवरून आवळीला ट्रॅक्टर नेण्यात आले होते.दरम्यान, गुरूवारला दिवसभरातून नदीपात्रात पाणी वाढल्यामुळे ट्रॅक्टर आवळीमध्येच ठेवण्यात आले होते. सहा दिवस होऊनही नदी पात्रातील पाणी कमी न झाल्यामुळे पलीकडील शेतीची कामे करण्यासाठी गावातील काही धाडसी तरूणांनी रॉकेलचे रिकामे ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडून बाहेर काढण्याचे ठरविले. आणि गुरूवारला सकाळी गावातील रॉकेल दुकानातील रिकामे २१ ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडले आणि एक-एक करून सहाही ट्रॅक्टर बाहेर काढले. तरूणांनी घेतलेला हा निर्णय जिवघेणा आणि तितकाच धाडसी असल्यामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूला गावकºयांनी हा प्रकार बघण्यासाठी गर्दी केली होती.या घटनेची माहिती होताच नायब तहसिलदार विजय कावळे, तलाठी कौरवार, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. धाडसामुळे हे ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले असले तरी हा जीवघेणा प्रवास आमच्या पाचवीला पूजलेला राहणार का? असा संतप्त सवाल सोनी-आवळी येथील ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :floodपूरriverनदी